शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दूध, साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

अमरावती : साखर आणि दुधाचे दर स्थिर असतानादेखील सणासुदीच्या तोंडावर शहरातील स्वीट मार्टचालकांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. ...

अमरावती : साखर आणि दुधाचे दर स्थिर असतानादेखील सणासुदीच्या तोंडावर शहरातील स्वीट मार्टचालकांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. यामुळे आधीच महागाईने त्रस्त नागरिकांना मिठाईच्या दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.

डेअरीमधून गाईच्या दुधाची ४० ते ४२ रुपये तर म्हशीच्या दुधाची ६० रुपये लिटरप्रमाणे विक्री होत आहे. साखरेची किरकोळ बाजारात ४० ते ४२ आणि घाऊक बाजारात ३८ ते ४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. साखरेच्या भावात चढ-उतार होत असला तरी दुधाचे दर मागील काही महिन्यांपासून स्थिर आहेत. मिठाई विक्रेत्यांकडून ५० ते ५५ रुपये लिटर दराने काठियावाडी व अन्य दूध उत्पादकांकडून दूध खरेदी केली जाते. उत्पादकांना स्वीट मार्ट चालकांकडून कवडीमोल भाव दिला जात असताना मिठाईची मात्र चढ्या दरात विक्री केली जात आहे. सणासुदीत आवश्यक म्हणून ग्राहकांना भाव वाढले असतानादेखील निमूटपणे मिठाई खरेदी करावी लागत आहे. स्वीट मार्टचालकांकडून खवा पेढ्याची ३६० रुपये प्रतिकिलो, केशर पेढा ४०० रुपये प्रतिकिलो, काजूकतली ८०० रुपये प्रतिकिलो, मलाई पेढा ३६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. पेढ्याच्या दरात किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आगामी काळात नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दसरा दिवाळी आदी महत्त्वपूर्ण सण आहेत. मिठाईचे दर असेच राहणार असल्याचे व्यावसायिकाने सांगितले.

बॉक्स

का दर वाढले?

मागील काही दिवसांपासून दूध आणि साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध ५० ते ६० रुपये, तर साखर ४२ ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी लागत आहे. दुसरीकडे मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे मिठाईच्या दरात वाढ केली आहे.

- स्वीट मार्टचालक, अमरावती

बेसन आणि डाळींच्या दरात वाढ झाली असून साखरेच्या भावातही मागील काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. घाऊक बाजारात ३८ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने साखरेची खरेदी करावी लागत आहे. यामुळे मिठाईच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

- स्वीट मार्टचालक, अमरावती

बॉक्स

ग्राहक म्हणतात...

जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाली असतानाच सणासुदीच्या तोंडावर मिठाई विक्रेत्यांकडून मिठाईचे दर वाढविण्यात आले आहेत. मात्र, सणोत्सवाच्या काळात प्रसादासाठी खरेदी करावीच लागतात.

- कोमल बांबोडे, अमरावती

सणासुदीच्या काळात मिठाई व अन्य खाद्यपदार्थांत भेसळीची अधिक शक्यता असते. याकरिता मिठाई खरेदी करण्याऐवजी खरीच उकडीचे मोदक, मोतीचूर लाडू व अन्य मिष्टान्न तयार करण्यावर भर असतो.

- मुन्ना जोशी, अमरावती

बॉक्स

भेसळीकडे लक्ष असू द्या

- दुधापासून बनविलेल्या खव्याची मिठाई सर्वोत्तम असते. मात्र, खव्याचे प्रमाण कमी करून त्यात अन्य प्रकारचे पीठ आणि रासायनिक पदार्थ वापरले जातात.

- शुद्ध तुपात किंवा लोण्यात वनस्पती तूप मिसळणे. बेसण पिठात लाखी या विषारी डाळीचे पीठ मिसळले जाते.

- दुधामध्ये युरिया हे खत मिसळण्यात येते. पनीरमध्येही स्टार्च मिसळला जातो. तर तुपामध्ये शिजविलेल्या बटाट्याचा किंवा रताळ्याचा गर मिसळला जातो.

****