शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

मेळघाट जलमय; २७ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:58 AM

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे.

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात संततधार पूल खचले, युवक बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. यात दिया व उतावली दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने धारणी तालुक्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. २४ तासांत मेळघाटात तब्बल २३७ मिमी पाऊस झाल्याने मेळघाट जलमय झाला आहे. मेळघाटातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पहिल्याच मोठ्या पावसाने मेळघाटातील आदिवासी बांधवांचे जीवनमान प्रभावित झाले आहे.गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील दोन तालुक्यांच्या १२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना, गडगा, तापी व छोट्या मोठ्या नदीनाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास सिपना नदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे हरिसाल येथील दहा व दुनी येथील काही घरांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाद्वारे तेथील बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांची जि.प. शाळेमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परतवाडा ते अंजनगाव सुर्जी रस्त्यावर सापन नदीवरील वडगाव फत्तेपूर येथील पूल खचलेला असून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चिखलदरा तालुक्यातील चुरणी-काटकुंभ मार्गावर दरड कोसळल्याने तो मार्ग काही कालावधीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानूर प्र्रकल्पामध्ये मासे पकडण्यास गेलेला तरुण वाहत गेला. घरालगतच्या जि.प. शाळेची भिंत अंगावर कोसळून एक चिमुकली गंभीर जखमी झाली. धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर व मोर्शी तालुक्याला संततधार पावसाचा फटका बसला. ७२ तासांपासून कोसळत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील अप्पर वर्धा, सपन, पूर्णा, शहानूर व चंद्रभागा या पाचही सिंचन प्रकल्पांच्या जलसंचयात मोठी वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार शोध बचाव पथकाचे दोन पथक मेळघाटात पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Rainपाऊस