शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे ४६ व्या वर्षात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 17:35 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा प्रकल्प २२ फेब्रुवारी रोजी ४६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पण, या ४५ वर्षांत वाघाला खायला पुरेशे खाद्य, तृणभक्षी प्राणी उपलब्ध करून देण्यात व्याघ्र प्रकल्प अपयशी ठरला आहे.

- अनिल कडूपरतवाडा (अमरावती) - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा प्रकल्प २२ फेब्रुवारी रोजी ४६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पण, या ४५ वर्षांत वाघाला खायला पुरेशे खाद्य, तृणभक्षी प्राणी उपलब्ध करून देण्यात व्याघ्र प्रकल्प अपयशी ठरला आहे. तूर्तास मेळघाटात केवळ ४० वाघ आहेत. जंगलात खायला पुरेशे खाद्य नसल्यामुळे वाघांची संख्या रोडावत आहे. उंदीर, ससा, मुंगूस यासह जे हाती लागेल त्यावर त्याला आपली भूक क्षमवावी लागत आहे. कधी उपाशीपोटी, कधी अर्धपोटी राहत असलेला मेळघाटातील वाघ उंदीरही खात असल्याचा निष्कर्ष, अमरावती विद्यापीठांतर्गत प्राणिशास्त्र विभागातील संशोधकाने मांडला आहे.  सव्वाशे वाघांची क्षमता असलेला मेळघाट ४० वाघांवर स्थिरावला आहे. कधी ३९, तर कधी ५६ वाघ दाखविले जातात. रंगुबेली, हरिसाल, सेमाडोह, जारिदा, माखलासह सिपना व गुगामल वन्यजीव विभागातील जंगलाची पत घसरत अहे. मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये शिकाºयांचा ताण जंगलावर वाढला आहे. वाघांचा अधिवास सुरक्षित नसल्याने  कोकटू किंवा कोअर भागातील दोन-चार अपवाद वगळता मेळघाटातील वाघीन  केवळ एक ते दोन पिलं जन्माला घालते. ताडोबात मात्र हीच संख्या तीन ते चार असल्याच्या नोंदी आहे.एन्डायरो रिझर्व्ह संघटनेने पाच वर्षाच्या अभ्यासाच्या आधारावर प्रकल्पातील तृणभक्षी प्राण्यांची प्रति चोरस किमी घनता स्पष्ट करताना सांबर २.७, गौर १, चौसिंगा ०.५, तर भेडकी ०.६ एवढी वर्तविली आहे. तृणभक्षी प्राण्यांची घनता मेळघाटात याहून कमी आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात येण्याआधी १९७२ मध्ये मेळघाट क्षेत्रात २१० वाघ होते. प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर ३२ वाघ नोंदविले गेले. १९७९ ला वाघांची संख्या ६३ वर गेली. १९८४ मध्ये ८० वाघ नोंदल्या गेलेत. मात्र पुढे १९८९ मध्ये ७७, १९९३  मध्ये ७२, १९९५ मध्ये ७१, १९९७ मध्ये ७३, २००७ मध्ये ५८ वाघ मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नोंदले गेलेत. २०१४ मध्ये देशपातळीवरील व्याघ्र गणनेत केवळ ३२ वाघ नोंदल्या गेलेत. २०१६ मध्ये ४३ तर, २०१७ मध्ये ४१, तर २०१८ मध्ये ५६ वाघ मेळघाटात आहेत. मेळघाटची जैवविविधता देशपातळीवर उल्लेखनिय ठरली असली तरी पर्यटक मात्र मेळघाटातील  वाघांबाबत साशंक आहेत. केवळ पायांचे ठसे बघण्याचे सौभाग्य पर्यटकांना मिळते. देशातील ‘टॉप टेन’मध्ये आपले स्थान टिकवून ठेवणाºया मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हे वाघ केवळ कॅमेरा ट्रॅपपुरतेच मर्यादित आहेत. पर्यटकांना वन्यास्रवांसह व्याघ्र दर्शन घडावे म्हणून विकसित केल्या गेलेल्या पर्यटनक्षेत्रातही ते दिसेनासे झाले आहेत. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी आहे. वाघाला पुरेसे खाद्य मेळघाटात उपलब्ध नाही. मेळघाटातील वाघ उंदीर खातो. अमरावती विद्यापीठांतर्गत प्राणिशास्त्र विषयात पीएचडी करणाºया एका  संशोधकाने हा निष्कर्ष २००८-०९ मध्येच आपल्या शोधप्रबंधात मांडला आहे. 

ताडोबातील वाघीण तीन ते चार पिलं जन्माला घालते. मेळघाटात मात्र एक किंवा दोनच पिलं जन्माला येतात. मेळघाटातील वाघीण आपल्या पिल्लांच्या भविष्याविषयी, खाद्याविषयी, सुरक्षित अधिवासाविषयी साशंक आहे. - जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पMelghatमेळघाटMaharashtraमहाराष्ट्र