शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे ४६ व्या वर्षात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 17:35 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा प्रकल्प २२ फेब्रुवारी रोजी ४६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पण, या ४५ वर्षांत वाघाला खायला पुरेशे खाद्य, तृणभक्षी प्राणी उपलब्ध करून देण्यात व्याघ्र प्रकल्प अपयशी ठरला आहे.

- अनिल कडूपरतवाडा (अमरावती) - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा प्रकल्प २२ फेब्रुवारी रोजी ४६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पण, या ४५ वर्षांत वाघाला खायला पुरेशे खाद्य, तृणभक्षी प्राणी उपलब्ध करून देण्यात व्याघ्र प्रकल्प अपयशी ठरला आहे. तूर्तास मेळघाटात केवळ ४० वाघ आहेत. जंगलात खायला पुरेशे खाद्य नसल्यामुळे वाघांची संख्या रोडावत आहे. उंदीर, ससा, मुंगूस यासह जे हाती लागेल त्यावर त्याला आपली भूक क्षमवावी लागत आहे. कधी उपाशीपोटी, कधी अर्धपोटी राहत असलेला मेळघाटातील वाघ उंदीरही खात असल्याचा निष्कर्ष, अमरावती विद्यापीठांतर्गत प्राणिशास्त्र विभागातील संशोधकाने मांडला आहे.  सव्वाशे वाघांची क्षमता असलेला मेळघाट ४० वाघांवर स्थिरावला आहे. कधी ३९, तर कधी ५६ वाघ दाखविले जातात. रंगुबेली, हरिसाल, सेमाडोह, जारिदा, माखलासह सिपना व गुगामल वन्यजीव विभागातील जंगलाची पत घसरत अहे. मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये शिकाºयांचा ताण जंगलावर वाढला आहे. वाघांचा अधिवास सुरक्षित नसल्याने  कोकटू किंवा कोअर भागातील दोन-चार अपवाद वगळता मेळघाटातील वाघीन  केवळ एक ते दोन पिलं जन्माला घालते. ताडोबात मात्र हीच संख्या तीन ते चार असल्याच्या नोंदी आहे.एन्डायरो रिझर्व्ह संघटनेने पाच वर्षाच्या अभ्यासाच्या आधारावर प्रकल्पातील तृणभक्षी प्राण्यांची प्रति चोरस किमी घनता स्पष्ट करताना सांबर २.७, गौर १, चौसिंगा ०.५, तर भेडकी ०.६ एवढी वर्तविली आहे. तृणभक्षी प्राण्यांची घनता मेळघाटात याहून कमी आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात येण्याआधी १९७२ मध्ये मेळघाट क्षेत्रात २१० वाघ होते. प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर ३२ वाघ नोंदविले गेले. १९७९ ला वाघांची संख्या ६३ वर गेली. १९८४ मध्ये ८० वाघ नोंदल्या गेलेत. मात्र पुढे १९८९ मध्ये ७७, १९९३  मध्ये ७२, १९९५ मध्ये ७१, १९९७ मध्ये ७३, २००७ मध्ये ५८ वाघ मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नोंदले गेलेत. २०१४ मध्ये देशपातळीवरील व्याघ्र गणनेत केवळ ३२ वाघ नोंदल्या गेलेत. २०१६ मध्ये ४३ तर, २०१७ मध्ये ४१, तर २०१८ मध्ये ५६ वाघ मेळघाटात आहेत. मेळघाटची जैवविविधता देशपातळीवर उल्लेखनिय ठरली असली तरी पर्यटक मात्र मेळघाटातील  वाघांबाबत साशंक आहेत. केवळ पायांचे ठसे बघण्याचे सौभाग्य पर्यटकांना मिळते. देशातील ‘टॉप टेन’मध्ये आपले स्थान टिकवून ठेवणाºया मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हे वाघ केवळ कॅमेरा ट्रॅपपुरतेच मर्यादित आहेत. पर्यटकांना वन्यास्रवांसह व्याघ्र दर्शन घडावे म्हणून विकसित केल्या गेलेल्या पर्यटनक्षेत्रातही ते दिसेनासे झाले आहेत. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी आहे. वाघाला पुरेसे खाद्य मेळघाटात उपलब्ध नाही. मेळघाटातील वाघ उंदीर खातो. अमरावती विद्यापीठांतर्गत प्राणिशास्त्र विषयात पीएचडी करणाºया एका  संशोधकाने हा निष्कर्ष २००८-०९ मध्येच आपल्या शोधप्रबंधात मांडला आहे. 

ताडोबातील वाघीण तीन ते चार पिलं जन्माला घालते. मेळघाटात मात्र एक किंवा दोनच पिलं जन्माला येतात. मेळघाटातील वाघीण आपल्या पिल्लांच्या भविष्याविषयी, खाद्याविषयी, सुरक्षित अधिवासाविषयी साशंक आहे. - जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पMelghatमेळघाटMaharashtraमहाराष्ट्र