शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील अनेक प्रकल्प तहानलेले! ४९९ प्रकल्पात ५८.०२ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 17:07 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे.

 - संदीप मानकर 

अमरावती - मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पावसाच्या प्रतीक्षेत असून, तेथील १०५ प्रकल्पांमध्ये फक्त १३.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने चिंता वाढली आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघू असे एकूण ४९९ प्रकल्पांतील संकल्पित पाणीसाठा हा ३२८३.६३ दलघमी आहे. आजचा पाणीसाठा हा १९०५.०९ दलघमी आहे. शेकडो प्रकल्पांच्या पाणीसाठ्याची स्थिती ही बिकट आहे. उन्हाळयात अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईची झड पोहचू शकते. २४ आॅगस्टपर्यंत अमरावती जिल्ह्यामधील ८४ प्रकल्पांमध्ये ४८.९० टक्के पाणीसाठा आहे. सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. मागील वर्षी ४१.१६ टक्के होता. यामध्ये अप्पर वर्धामधून अमरावती शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पात फक्त ४६.८८ टक्के पाणीसाठा आहे. दोन आठवड्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने व नद्यांना पूरसुद्धा आल्याने जिल्ह्यातील ११८ प्रकल्पात ८०.२६ टक्के प्रकल्प भरले आहेत. मागील वर्षी बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला २७.८४ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ७५.३७ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पात ६६.६५ टक्के भरले आहेत. मागील वर्षी २०.९२ टक्के पाणीसाठा होता. येथील दोन मोठ्या प्रकल्पांची स्थिती यंदा चांगली आहे. मात्र, मध्यम प्रकल्प ५८ टक्के भरले आहेत. वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पाची टक्केवारी ७१.४६ टक्के आहे. मागील वर्षी फक्त १५.६५ टक्के होती. बुलडाणा जिल्ह्याची यंदा स्थिती फारच खराब असून, १०५ प्रकल्पांमध्ये सरासरी १३.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येथील तीन मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ८.९७ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीसुद्धा हीच परिस्थिती होती. १६.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. 

 बुलडाण्यातील मध्यम प्रकल्पांची स्थिती गंभीर बुलडाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये असलेल्या मध्यम प्रकल्पांचीही स्थिती गंभीर असून, सात मध्यम प्रकल्पांमध्ये १८.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची स्थिती चांगली असून, सद्यस्थितीत चार मध्यम प्रकल्पांमध्ये ६०.९८ टक्के पाणीसाठा आहे. अकोल्यात चार प्रकल्पांमध्ये ५८.४८ टक्के, तर वाशिममध्ये तीन प्रकल्पांत ९१.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

जिल्हा  प्रकल्प    पाणीसाठा  सरासरी टक्केवारीअमरावती  ८४-   ४८.९० यवतमाळ   ११८- ८०.२६अकोला    ४६-    ६६.६५वाशिम     १४६ -  ७१.४६बुलढाणा   १०५  -   १३.६९एकूण       ४९९-    ५८.०२

महिन्याभरात चांगला पावसाची प्रतीक्षा आहे. काही प्रकल्प अपेक्षित नियोजनानुसार भरले नाहीत, तर आॅक्टोबरमध्ये आढावा घेऊन अनेक जिल्ह्यांत प्रकल्पांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवला जाईल. - रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :DamधरणWaterपाणी