शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पश्चिम विदर्भातील अनेक प्रकल्प तहानलेले! ४९९ प्रकल्पात ५८.०२ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 17:07 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे.

 - संदीप मानकर 

अमरावती - मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पावसाच्या प्रतीक्षेत असून, तेथील १०५ प्रकल्पांमध्ये फक्त १३.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने चिंता वाढली आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघू असे एकूण ४९९ प्रकल्पांतील संकल्पित पाणीसाठा हा ३२८३.६३ दलघमी आहे. आजचा पाणीसाठा हा १९०५.०९ दलघमी आहे. शेकडो प्रकल्पांच्या पाणीसाठ्याची स्थिती ही बिकट आहे. उन्हाळयात अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईची झड पोहचू शकते. २४ आॅगस्टपर्यंत अमरावती जिल्ह्यामधील ८४ प्रकल्पांमध्ये ४८.९० टक्के पाणीसाठा आहे. सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. मागील वर्षी ४१.१६ टक्के होता. यामध्ये अप्पर वर्धामधून अमरावती शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पात फक्त ४६.८८ टक्के पाणीसाठा आहे. दोन आठवड्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने व नद्यांना पूरसुद्धा आल्याने जिल्ह्यातील ११८ प्रकल्पात ८०.२६ टक्के प्रकल्प भरले आहेत. मागील वर्षी बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला २७.८४ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ७५.३७ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पात ६६.६५ टक्के भरले आहेत. मागील वर्षी २०.९२ टक्के पाणीसाठा होता. येथील दोन मोठ्या प्रकल्पांची स्थिती यंदा चांगली आहे. मात्र, मध्यम प्रकल्प ५८ टक्के भरले आहेत. वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पाची टक्केवारी ७१.४६ टक्के आहे. मागील वर्षी फक्त १५.६५ टक्के होती. बुलडाणा जिल्ह्याची यंदा स्थिती फारच खराब असून, १०५ प्रकल्पांमध्ये सरासरी १३.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येथील तीन मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ८.९७ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीसुद्धा हीच परिस्थिती होती. १६.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. 

 बुलडाण्यातील मध्यम प्रकल्पांची स्थिती गंभीर बुलडाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये असलेल्या मध्यम प्रकल्पांचीही स्थिती गंभीर असून, सात मध्यम प्रकल्पांमध्ये १८.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची स्थिती चांगली असून, सद्यस्थितीत चार मध्यम प्रकल्पांमध्ये ६०.९८ टक्के पाणीसाठा आहे. अकोल्यात चार प्रकल्पांमध्ये ५८.४८ टक्के, तर वाशिममध्ये तीन प्रकल्पांत ९१.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

जिल्हा  प्रकल्प    पाणीसाठा  सरासरी टक्केवारीअमरावती  ८४-   ४८.९० यवतमाळ   ११८- ८०.२६अकोला    ४६-    ६६.६५वाशिम     १४६ -  ७१.४६बुलढाणा   १०५  -   १३.६९एकूण       ४९९-    ५८.०२

महिन्याभरात चांगला पावसाची प्रतीक्षा आहे. काही प्रकल्प अपेक्षित नियोजनानुसार भरले नाहीत, तर आॅक्टोबरमध्ये आढावा घेऊन अनेक जिल्ह्यांत प्रकल्पांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवला जाईल. - रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :DamधरणWaterपाणी