शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र

By admin | Updated: September 29, 2014 22:51 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र राज्यावर तीन लाख कोटी रूपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा विपरित स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कर्जाचे व्याज भरण्यात गुंडाळला जाईल की काय, अशी स्थिती

भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ : नितीन गडकरी यांचा आरोपतिवसा : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र राज्यावर तीन लाख कोटी रूपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा विपरित स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कर्जाचे व्याज भरण्यात गुंडाळला जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र या आघाडी सरकारच्या भ्रष्ट्राचारामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला.सोमवारी सायंकाळी तिवसा येथे आयोजित भाजपच्या जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अरूण अडसड, प्रवीण पोटे, मतदारसंघाचे निरीक्षक व लखनौ येथील महापौर दिनेश शर्मा, पद्माकर पाकोडे, जिल्हा सरचिटणीस दिनेश सूर्यवंशी, विजय पुनसे, इंद्रायणी थेटे, रिपाइं आठवले गटाचे अनिल गोंडाणे, भाजपचे तिवसा तालुकाध्यक्ष नंदलाल गंधे, रूपेश ढेपे, अमरावती तालुकाध्यक्ष मोहन तळकीत, भातकुली तालुकाध्यक्ष मनोज लोखंडे, सुरेश मुंधडा, संघटन मंत्री शिवराय कुळकर्णी, तालुका सरचिटणीस शेखर नंदनवार आदी उपस्थित होते. यावेळी राजीव जामठे यांनी गडकरींच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. सभेत पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात सिंचन केवळ ०.०१ टक्क्यांनी वाढले, याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राज्यात ८० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यांना जर वीज जोडणी मिळाली असती तर ८ ते १० लाख हेक्टर सिंचनाचे क्षेत्र वाढले असते. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला असता. विजेचे भारनियमनही सुरू आहे. वीज नाही म्हणून या भागात उद्योग यायला तयार नाही. एमआयडीसी ओस पडली. भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार नाही, दररोज कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. गावात रोजगार नाही म्हणून लोक शहराकडे धाव घेत आहेत. गाव ओस पडेल की काय, अशी परिस्थिती काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने आणली असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यात किमान १० हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळेल असा उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा झाला, असा आरोप गडकरींनी केला. प्रास्ताविक निवेदिता चौधरी, संचालन व आभार प्रदर्शन जयंत डेहणकर यांनी केले.