शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

जात वैधता नसलेल्या राज्यातील ११ हजार ७०० कर्मचा-यांची नोकरी धोक्यात, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 17:13 IST

राज्यात बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावणा -या ११ हजार ७०० अधिकारी, कर्मचाºयांची नोकरी धोक्यात आली आहे. त्याअनुषंगाने कर्मचा-यांची जात वैधता प्रमाणपत्र तपासणी मोहीम सुरू झाली असून ‘व्हॅलिडिटी’ नसल्यास नोकरीतून कमी करण्याचे निर्देश प्रधान मुख्य सचिवांनी सर्वच विभागप्रमुखांना दिले आहेत. 

- गणेश वासनिक 

अमरावती - राज्यात बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावणा -या ११ हजार ७०० अधिकारी, कर्मचाºयांची नोकरी धोक्यात आली आहे. त्याअनुषंगाने कर्मचा-यांची जात वैधता प्रमाणपत्र तपासणी मोहीम सुरू झाली असून ‘व्हॅलिडिटी’ नसल्यास नोकरीतून कमी करण्याचे निर्देश प्रधान मुख्य सचिवांनी सर्वच विभागप्रमुखांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्रमांक ८९२८/२०१५ (चेअरमन अ‍ॅन्ड मॅनेजिंग डायरेक्टर, एफसीआय आणि इतर विरुद्ध जगदीश बाळाराम बहिरा व इतर) प्रकरणी ६ जुलै २०१७ रोजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अथवा इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या आधारे शासन सेवेत दाखल झालेल्या आणि त्यानंतर त्यांच्या जातीचे दावे अवैध ठरलेल्या व्यक्तिंना शासकीय सेवेत संरक्षण देय ठरत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्याचे प्रधान मुख्य सचिव सुमित मलिक यांनी २० जानेवारी २०१८ रोजी प्रमुख अधिकाºयांची बैठक घेतली. अनुसूचित जमातीप्रमाणेच अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग यांनी जात प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत रूजू होताना अधिकारी, कर्मचारी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यानुसार अशा अधिकारी, कर्मचाºयांची माहिती तसेच अवैध ठरलेल्या कर्मचाºयांपैकी किती जणांना सेवेतून कमी करण्यात आले, याचा लेखाजोखा मुख्य सचिव सुमित मलिक यांनी तपासला. मात्र, जात चोरून वर्षांनुवर्षे नोकरी बळाकावणाºया अधिकारी, कर्मचाºयांना वरिष्ठांकडून अभय मिळत असल्याचे वास्तव मुख्य सचिव मलिक यांच्या लक्षात आले. राज्यात ११ हजार ७०० अधिकारी, कर्मचाºयांकडे जात ‘व्हॅलिडिटी’ नसतानाही त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई झालेली नाही, हे विशेष.

जात चोरीप्रकरणी अचूक माहिती पाठवाज्या अधिकारी, कर्मचाºयांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, अशांची विवरणपत्रात अचूक माहिती पाठविण्याबाबतचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टि.वा. करपते यांनी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी क्षेत्रीय कार्यालये, महामंडळांसह प्रशासकीय विभागप्रमुखांना कळविले आहे. आठ दिवसांत यासंदर्भात माहिती पाठविण्याचे निर्देश दिले असतानासुद्धा याबाबत कमालीची अनास्था दिसून येत आहे.

- तर प्रधान मुख्य सचिवांविरुद्ध कारवाईराज्यात बोगस जातीच्या आधारे ११ हजार ७०० अधिकारी, कर्मचारी नोकरीत कायम आहेत. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. ज्या कर्मचाºयांकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही, अशांना नोकरीतून कमी करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे. या आदेशाचे पालन न केल्यास सर्वोच्च न्यायालय राज्याचे प्राधन मुख्य सचिवांविरुद्ध कारवाई करेल, असे निर्देश आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रEmployeeकर्मचारी