शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

Maharashtra Election 2019 ; प्रचार शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 6:00 AM

जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी, मेळघाट या आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावात व परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघत आहे. मोठ्या पदयात्रा आणि त्यादरम्यान होणाऱ्या घोषणाबाजीने कार्यकर्ते परिसर दणाणून सोडताहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री १० पर्यंत कायम असतो.

ठळक मुद्देनिवडणूक रणसंग्राम : आठही मतदारसंघांत पकडला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार १९ ऑक्टोबरला ५ वाजता संपणार आहे. १७ ऑक्टोबरपासून अवघे तीन दिवस प्रचारासाठी शिल्लक राहत असल्याने उमेदवार, त्यांचे कुटुंबीय व समर्थकांनी अक्षरश: पायाला भिंगरी बांधली आहे. ‘कोण आला रे कोण?’ अशा घोषणांनी गल्लीबोळात रॅली निघत आहे. पदयात्रेत डोक्यावर टोपी, गळ्यात दुपट्टा आणि उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर पिंजून काढणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील इलेक्शन फिव्हर वाढविले आहे. त्यांच्या जोडीला दिग्गजांच्या होणाऱ्या सभांमुळे प्रचाराची रंगत आणखी वाढत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मोर्शी, मेळघाट या आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावात व परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघत आहे. मोठ्या पदयात्रा आणि त्यादरम्यान होणाऱ्या घोषणाबाजीने कार्यकर्ते परिसर दणाणून सोडताहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री १० पर्यंत कायम असतो. मित्रमंडळी, पाहुणे यांना गाठून उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सोशल मीडियाचा खुबीने वापर करीत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याची काळजी घेतली जात आहे. युवक संवाद, महिला मेळावा, ज्येष्ठांचा मेळावा यांची मांदियाळी सुरू आहे. निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी भेटीगाठी, कार्नर सभा आणि समाजाच्या बैठकींना प्राधान्य देण्यात येत आहे. १९ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. यामुळे राहिलेल्या कालावधीत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू आहे. उमेदवार स्वत: नाही पोहोचला तरी घरातील व्यक्ती मतदारापर्यंत जावी, या पद्धतीने प्रचाराचे नियोजन केले जात आहे.आठही मतदारसंघांमध्ये प्रत्येकी अडीच ते तीन लाखांहून अधिक मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार, कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. अंतिम टप्प्यात प्रचाराचा फेरआढावा घेतला जात आहे. एकगठ्ठा मतदान असलेल्या ठिकाणी पुन:पुन्हा जाऊन संपर्कात राहण्याचा प्रयत्न होत आहे. उमेदवार व समर्थक रात्री २ पर्यंत जाग्रण करीत आहेत. प्रचाराची वेळ संपल्यावर रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होते. त्यात दुसऱ्या दिवशीच्या प्रचाराचे नियोजन केले जाते. आहे. २१ ऑक्टोबरला मतदान, तर २४ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे.सायंकाळची प्रचार रॅली, कार्नर बैठकींना पसंतीअलीकडे शेतीकामे जोरात सुरु असल्याने उमेदवार गावात पोहचले की, घरी मतदार मिळत नसल्याचे ग्रामीण भागातील वास्तव आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बहुतांश उमेदवारांनी प्रचारासाठी सायंकाळी पसंती दर्शविली आहे. प्रचार सभा, रॅली, कार्नर बैठकी अथवा रोड शो हे सायंकाळी आयोजन करण्यात येत आहेत.गुप्त बैठकींना वेगसकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत उमेदवार प्रचार रॅली, कॉर्नर सभा, मतदारांच्या भेटी यात व्यस्त आहेत. मात्र, रात्री १० नंतर निवडक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत गुप्त बैठकांनासुद्धा वेग आला आहे. विजयाचे प्लॅनिंग, एकगठ्ठा मते कशी मिळतील, याचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. गावखेड्यात राजकीय दबदबा असलेल्या पुढाऱ्यांना या गुप्त बैठकीत महत्त्व दिले जात आहे. मतदान चार दिवसांवर आले असताना अशा खलबतांना वेग आल्याचे चित्र सर्व मतदारसंघांत आहे.सोशल मीडियाची साथदिवसभरात केलेला दौरा, मिळालेला पाठिंबा, घेतलेल्या बैठकी, भाषण आणि जाहीरनामे यांची इत्थंभूत माहिती मतदारांना मिळावी, यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जात आहे. दुसºया दिवशीचे नियोजन सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंंत पोहचविले जात आहे. परिसरानुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाले आहेत. त्या-त्या परिसरात उमेदवारांच्या प्रचाराची माहिती दिली जात आहे. प्रचाराला कमी कालावधी मिळाल्याने सोशल मीडियाची मोठी साथ उमेदवारांना प्रचारासाठी लाभली आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती