शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: गांधी आणि पवार कुटुंबांमुळे वंशवाद फोफावला: अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 19:40 IST

Maharashtra Election 2019: काँग्रेसचे राजकारण गांधी परिवारासमोर जात नाही. शरद पवारांनीही मुलगी, पुतण्या, नातू व आप्तांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला.

अमरावती: काँग्रेसचे राजकारण गांधी परिवारासमोर जात नाही. शरद पवारांनीही मुलगी, पुतण्या, नातू व आप्तांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला. भाजपमध्ये वंशवाद नाही. मात्र वंशवाद मुळात फोफावला असेल, तर तो केवळ गांधी, पवार कुटुंबामुळेच, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. अमरावतीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मौनीबाबा अशी संभावना करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. 

शेजारील राष्ट्राच्या हल्ल्याविरुद्ध चकार शब्द न काढणाऱ्या पक्षाला देशाने हद्दपार करून राष्ट्रहित जोपासणाºया नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून राष्ट्रवाद मजबूत केल्याचा दावा शहा यांनी के ला. ३७० कलम हटविल्यास ‘खून की नदिया बहेगी’ अशी धमकी दिली जात होती. मात्र, प्रत्यक्षात रक्ताचा एक थेंब न पडता ते कलम हटविल्याचे शहा म्हणाले. महाराष्ट्रातील तत्कालीन मंत्र्याने ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला. अवघे नऊ हजार कोटी रुपये खर्च करून देवेंद्र फडवणीस सरकारने पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण केल्याची माहिती त्यांनी दिली.

मेळघाटात राहणाऱ्या आदिवासींसह सर्व समाजाचे हित जोपासण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र व राज्य सरकारने समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन समान न्याय दिल्याचेही ते म्हणाले. १५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करीत मोदी सरकारने सहा वर्षांच्या काळात शेवटच्या घटकांपर्यंत योजना व त्यांचा लाभ पोहोचविल्याचा दावा केला. मंचावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, तथा भाजप-सेना युतीचे उमेदवार उपस्थित होते.

टॅग्स :Amit Shahअमित शहाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाamravati-acअमरावती