शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Election 2019: गांधी आणि पवार कुटुंबांमुळे वंशवाद फोफावला: अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 19:40 IST

Maharashtra Election 2019: काँग्रेसचे राजकारण गांधी परिवारासमोर जात नाही. शरद पवारांनीही मुलगी, पुतण्या, नातू व आप्तांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला.

अमरावती: काँग्रेसचे राजकारण गांधी परिवारासमोर जात नाही. शरद पवारांनीही मुलगी, पुतण्या, नातू व आप्तांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला. भाजपमध्ये वंशवाद नाही. मात्र वंशवाद मुळात फोफावला असेल, तर तो केवळ गांधी, पवार कुटुंबामुळेच, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. अमरावतीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मौनीबाबा अशी संभावना करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. 

शेजारील राष्ट्राच्या हल्ल्याविरुद्ध चकार शब्द न काढणाऱ्या पक्षाला देशाने हद्दपार करून राष्ट्रहित जोपासणाºया नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून राष्ट्रवाद मजबूत केल्याचा दावा शहा यांनी के ला. ३७० कलम हटविल्यास ‘खून की नदिया बहेगी’ अशी धमकी दिली जात होती. मात्र, प्रत्यक्षात रक्ताचा एक थेंब न पडता ते कलम हटविल्याचे शहा म्हणाले. महाराष्ट्रातील तत्कालीन मंत्र्याने ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला. अवघे नऊ हजार कोटी रुपये खर्च करून देवेंद्र फडवणीस सरकारने पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण केल्याची माहिती त्यांनी दिली.

मेळघाटात राहणाऱ्या आदिवासींसह सर्व समाजाचे हित जोपासण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र व राज्य सरकारने समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन समान न्याय दिल्याचेही ते म्हणाले. १५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करीत मोदी सरकारने सहा वर्षांच्या काळात शेवटच्या घटकांपर्यंत योजना व त्यांचा लाभ पोहोचविल्याचा दावा केला. मंचावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, तथा भाजप-सेना युतीचे उमेदवार उपस्थित होते.

टॅग्स :Amit Shahअमित शहाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाamravati-acअमरावती