शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Election 2019 ; आठ मतदारसंघांत १७२ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. शुक्रवारी आठ मतदारसंघांतून १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सुलभा खोडके (अमरावती), रवि राणा (बडनेरा), राजेश वानखडे (तिवसा), बच्चू कडू (अचलपूर) या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देएकूण २२९ अर्ज दाखल : बडनेरा, अमरावतीत सर्वाधिक २८; मेळघाटात सर्वात कमी १३ उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणूक नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत १७२ उमेदवारांनी २२९ अर्ज दाखल केले. अमरावती आणि बडनेऱ्यातून सर्वाधिक २८, तर मेळघाटातून सर्वात कमी १३ उमेदवार तूर्तास रिंगणात आहेत.नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. शुक्रवारी आठ मतदारसंघांतून १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सुलभा खोडके (अमरावती), रवि राणा (बडनेरा), राजेश वानखडे (तिवसा), बच्चू कडू (अचलपूर) या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अवधी आहे. त्यामुळे १७२ पैकी किती उमेदवार रिंगणात कायम राहतात, हे चित्र त्याच दिवशी सायंकाळी स्पष्ट होईल, असे निवडणूक विभागाने सांगितले.प्रचाराची रणधुमाळी ८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावतील. त्यामुळे उमेदवारांना खºया अर्थाने मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह, नाव, पक्ष पोहोचविण्यासाठी केवळ ११ दिवस मिळणार आहेत. आठही मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षासह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. तथापि, ७ ऑक्टोबर रोजी राजकीय मैदानात कोणता पहिलवान कायम राहील, यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.धामणगाव रेल्वे मतदारसंघात वीरेंद्र जगताप, प्रताप अडसड, प्रवीण घुईखेडकर, नीलेश विश्वकर्मा, सविता कटकतलवारे, अभिजित ढेपे यांच्यासह एकूण २४ उमेदवार आहेत. बडनेरा मतदारसंघात रवि राणा, प्रीती बंड, प्रमोद इंगळे, नीलेश थेटे, राजू जामनेकर, पुरुषोत्तम भटकर, सिद्धार्थ गोंडाणे, शैलेश गवई यांच्यासह एकूण २८ उमेदवार आहेत.अमरावती मतदारसंघात सुनील देशमुख, सुलभा खोडके, मो. अलिम पटेल यांच्यासह २८ उमेदवार आहे. तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर, राजेश वानखडे, दीपक सरदार, अब्दूल नईम यांच्यासह एकूण २१ उमेदवार आहे. दर्यापूर मतदारसंघात रमेश बुंदिले, बळवंत वानखडे, रेखा वाकपांजर, सीमा सावळे, गौतम इंगळे, सागर कलाने, चंद्रकांत बोदडे, मीनाक्षी करवाडे यांच्यासह २५ उमेदवार आहेत.मेळघाट मतदारसंघात रमेश मावस्कर, राजकुमार पटेल, केवलराम काळे, लक्ष्मण धांडे, रामकिशोर जांबू, शैलेश गावंडे यांच्यासह एकूण १३ उमेदवार आहेत. अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू, बबलू देशमुख, सुनीता फिस्के, राजेंद्र गवई यांच्यासह एकूण १५ उमेदवार आहेत. मोर्शी मतदारसंघात अनिल बोंडे, वसुधा बोंडे, राजेंद्र भाजीखाये, सैयद फारूख, देवेंद्र भुयार, नंदकिशोर कुयटे यांच्यासह एकूण १८ उमेदवार आहेत.श्रीराम नेहर यांचे ‘इंजिन’ हुकलेदर्यापूर : शपथपत्र दाखल करून अनामत रक्कम व उमेदवारी अर्ज वेळेत सादर करण्यात न आल्याने मनसेचे श्रीराम नेहर यांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागले. त्यांनी न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या उमेदवारी न मिळाल्याने श्रीराम नेहर यांनी मनसेकडे धाव घेतली. त्यांना शुक्रवारी मनसेचा ए, बी फॉर्म देण्यात आला. त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, उमेदवारी अर्जासोबत आवश्यक अनामत रक्कम व नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला नाही. दुपारी ३ नंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांना विनंती केली. परंतु, आता त्यांना नामनिर्देशनपत्र सादर करता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी सांगितले.

टॅग्स :amravati-acअमरावती