शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांच्या शिकारीसोबतच तस्करीमुळे वनविभाग हतबल; आरोपींना शिक्षा होण्यासाठी मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 16:03 IST

अलीकडे शिकार व तस्करीच्या घटनेमध्ये सहभागी आरोपींना कुठेतरी शिक्षेतून सुटण्याची संधी मिळत असल्याने वनविभाग मागे पडत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे कन्व्हेक्शन रेट वाढविण्यावर भर

गणेश वासनिक

अमरावती :वन्यजीवांची शिकार व त्यांच्या अवयवांच्या तस्करीमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी असून, हे रोखण्याचे आव्हान वनविभागापुढे उभे ठाकले आहे. शिकार व तस्करीच्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी न्यायालयात भक्कम खटला चालविण्यासाठी वनाधिकाऱ्यांना चांगल्या तपासाचे धडे दिले जाणार आहेत. याकरिता वनविभाग कामाला लागला आहे.

पोलिसांप्रमाणे वनविभागात तपास करण्याचे स्वतंत्र अधिकार असून, पोलिसांपेक्षा अधिकचे अधिकार प्रदान केलेले आहे. सध्या वनविभागाचे २५ हजारांच्या वर प्रकरणे न्यायालयात चालू आहेत. यामध्ये वन्यजीव शिकार, तस्करीचे अधिक आहेत.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार अनुसूची १ किंवा २ मध्ये शिकार केलेल्या वन्यजीवांच्या प्रकरणात किमान तीन वर्षाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. असे असले तरी अलीकडे शिकार व तस्करीच्या घटनेमध्ये सहभागी आरोपींना कुठेतरी शिक्षेतून सुटण्याची संधी मिळत असल्याने वनविभाग मागे पडत असल्याचे चित्र आहे. अर्थात, तपासी वनाधिकाऱ्यांना वनकायद्याचा अभाव, वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे घटनेकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, सरकारी वकिलाची न मिळणारी साथ, अशा अनेक कारणांनी वन्यजीवांच्या प्रकरणात बरेच आरोपी दोषमुक्त होतात. परिणामी आरोपीचे मनोधैर्य उंचावते. वाघ, बिबट, साप, मोर, ससे, मांजर, काळवीट, शेकरू, घुबड या वन्यजीवांच्या शिकार करून त्यांच्या अवयवांच्या तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध जोडले जातात. मात्र वनविभागाला एका राज्याबाहेर तपास करताना आवश्यक ती मदत मिळत नसल्याने वन्यजीव गुन्हेगारी वाढत असल्याची चिंता आता वनविभागाला भेडसावत आहे.

कायद्याची धार बोथट

वन्यजीव व वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी स्वतंत्र असे दोन वन अधिनियम वनविभागास मिळालेले आहेत. या कायद्यांमुळे वन्यजीव, वृक्षांना संरक्षण प्राप्त झालेले आहे. कठोर अशा कायद्याची मात्र वनविभाग हवी तशी अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. आरोपी ठेवण्यासाठी वनविभागाकडे कोठडी नाही. स्वतंत्र वन कर्मचाऱ्यांचा ताफा नाही, न्यायालयात आरोपीस नेताना होणाऱ्या अडचणीमुळे वनाधिकारी वन कायद्याचा उपयोग करताना दिसून येत नाही. कायदा कठोर असला तरी अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने कायद्याची धार बोथट झाली की काय, असे म्हणण्यास वाव मिळतो.

वनविभागाचे मंथन

राज्यात वन्यजीवांच्या शिकारी व तस्करीत सहभागी आरोपीविरुद्ध न्यायालयात तपास वन अधिकाऱ्यांनी भक्कमपणे बाजू मांडून आरोपीस शिक्षा मिळण्यासाठी वनविभागाला आता मंथन करण्याची वेळ आली आहे. एक आठवड्यापूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विभागाचे सुनील लिमये यांनी राज्यभरातील वनपरिक्षेत्र अधिकारी ते उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वनविषयक कायद्याच्या संबंधाने ऑनलाइन कार्यशाळा घेतली. यामध्ये सरकारी अभियोक्ता ॲड. परीक्षित गणोरकर यांनी चौकशीतील त्रुटींमुळे न्यायालयात वनविभागाची बाजू भक्कमपणे मांडता येत नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforestजंगलenvironmentपर्यावरणwildlifeवन्यजीव