शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांच्या शिकारीसोबतच तस्करीमुळे वनविभाग हतबल; आरोपींना शिक्षा होण्यासाठी मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 16:03 IST

अलीकडे शिकार व तस्करीच्या घटनेमध्ये सहभागी आरोपींना कुठेतरी शिक्षेतून सुटण्याची संधी मिळत असल्याने वनविभाग मागे पडत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे कन्व्हेक्शन रेट वाढविण्यावर भर

गणेश वासनिक

अमरावती :वन्यजीवांची शिकार व त्यांच्या अवयवांच्या तस्करीमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी असून, हे रोखण्याचे आव्हान वनविभागापुढे उभे ठाकले आहे. शिकार व तस्करीच्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी न्यायालयात भक्कम खटला चालविण्यासाठी वनाधिकाऱ्यांना चांगल्या तपासाचे धडे दिले जाणार आहेत. याकरिता वनविभाग कामाला लागला आहे.

पोलिसांप्रमाणे वनविभागात तपास करण्याचे स्वतंत्र अधिकार असून, पोलिसांपेक्षा अधिकचे अधिकार प्रदान केलेले आहे. सध्या वनविभागाचे २५ हजारांच्या वर प्रकरणे न्यायालयात चालू आहेत. यामध्ये वन्यजीव शिकार, तस्करीचे अधिक आहेत.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार अनुसूची १ किंवा २ मध्ये शिकार केलेल्या वन्यजीवांच्या प्रकरणात किमान तीन वर्षाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. असे असले तरी अलीकडे शिकार व तस्करीच्या घटनेमध्ये सहभागी आरोपींना कुठेतरी शिक्षेतून सुटण्याची संधी मिळत असल्याने वनविभाग मागे पडत असल्याचे चित्र आहे. अर्थात, तपासी वनाधिकाऱ्यांना वनकायद्याचा अभाव, वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे घटनेकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, सरकारी वकिलाची न मिळणारी साथ, अशा अनेक कारणांनी वन्यजीवांच्या प्रकरणात बरेच आरोपी दोषमुक्त होतात. परिणामी आरोपीचे मनोधैर्य उंचावते. वाघ, बिबट, साप, मोर, ससे, मांजर, काळवीट, शेकरू, घुबड या वन्यजीवांच्या शिकार करून त्यांच्या अवयवांच्या तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध जोडले जातात. मात्र वनविभागाला एका राज्याबाहेर तपास करताना आवश्यक ती मदत मिळत नसल्याने वन्यजीव गुन्हेगारी वाढत असल्याची चिंता आता वनविभागाला भेडसावत आहे.

कायद्याची धार बोथट

वन्यजीव व वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी स्वतंत्र असे दोन वन अधिनियम वनविभागास मिळालेले आहेत. या कायद्यांमुळे वन्यजीव, वृक्षांना संरक्षण प्राप्त झालेले आहे. कठोर अशा कायद्याची मात्र वनविभाग हवी तशी अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. आरोपी ठेवण्यासाठी वनविभागाकडे कोठडी नाही. स्वतंत्र वन कर्मचाऱ्यांचा ताफा नाही, न्यायालयात आरोपीस नेताना होणाऱ्या अडचणीमुळे वनाधिकारी वन कायद्याचा उपयोग करताना दिसून येत नाही. कायदा कठोर असला तरी अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने कायद्याची धार बोथट झाली की काय, असे म्हणण्यास वाव मिळतो.

वनविभागाचे मंथन

राज्यात वन्यजीवांच्या शिकारी व तस्करीत सहभागी आरोपीविरुद्ध न्यायालयात तपास वन अधिकाऱ्यांनी भक्कमपणे बाजू मांडून आरोपीस शिक्षा मिळण्यासाठी वनविभागाला आता मंथन करण्याची वेळ आली आहे. एक आठवड्यापूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विभागाचे सुनील लिमये यांनी राज्यभरातील वनपरिक्षेत्र अधिकारी ते उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वनविषयक कायद्याच्या संबंधाने ऑनलाइन कार्यशाळा घेतली. यामध्ये सरकारी अभियोक्ता ॲड. परीक्षित गणोरकर यांनी चौकशीतील त्रुटींमुळे न्यायालयात वनविभागाची बाजू भक्कमपणे मांडता येत नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforestजंगलenvironmentपर्यावरणwildlifeवन्यजीव