शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने बदलली लग्नाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.

ठळक मुद्देशेकडो लग्न साध्या पद्धतीने : बडेजावाला फाटा

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : लग्न समारंभ म्हटले म्हणजे अमुुक परिवारापेक्षा आपला थाट जादा हवा, अशी चढाओढ लागते. त्यांच्या मुलीच्या लग्नात जेवलेल्या वऱ्हाडापेक्षा आपल्या येथे जास्त लोक जेवले पाहिजे, हा प्रौढीचा मुद्दा झाला आहे. त्यातच धावपळ, मानसन्मान, रुसवे-फुगवे आले. लग्नकार्य पूर्ण होईपर्यंत वधुपिताच्या जिवाची धाकधूक सुरूच असते. कोरोनाने या सर्वांना फाटा देत अगदी मोजक्या लोकांमध्ये लग्नसमारंभ करण्याचा मंत्र दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.
एरवी लग्न समारंभाच्या दिवशी गाजावाजाशिवाय वातावरणनिर्मिती होत नसल्याचा सूर असतो. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो साध्या पद्धतीचे विवाह सोहळे पार पडले आहेत. त्यामुळे लग्न लावणाऱ्या कुटुंबांची लाखो रुपयांची बचत झाली आहे. कोणतेही वाद्य, घोडा, मंडप नाही. हजारो लोकांच्या जेवणाचा खर्च, लग्नसमारंभातील गाजावाजा, ध्वनिप्रदूषणही नाही. एवढेच नव्हे तर रुसवे-फुगवे, मानापमानाचे प्रसंग नाही. शारीरिक, मानसिक, आर्थिक ताण नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लग्नात गर्दी होत नसल्याने वऱ्हाडी मंडळीची गैरसोयही टळत आहे.
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सध्या सर्वत्र अशा पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत. यामध्ये वरपक्ष आणि वधुपक्षाकडचे लाखो रुपयांची बचत होत आहे. कोरोनाने जशी शारीरिक स्वच्छतेचे धडे दिले तसेच जुनाट सामाजिक प्रथांना अव्हेरून नवे बदल स्वीकारण्याची संधी दिली आहे.

आदर्श घ्यावाच
सध्या विवाहांना सुरुवात झाली असून, आता पुढे अशाच लग्नबाबत समाधान असू द्यावे, अशी अपेक्षा अनेक व्यक्ती व्यक्त करीत आहेत. साध्या पद्धतीने विवाह सोहळ्याची ही प्रथा अशीच चालू राहिली, तर शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणारी सर्वसाधारण कुटुंबे यापुढे लग्नासाठी झालेल्या अवाजवी खर्चातून कर्जबाजारी होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न