शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

पश्चिम विदर्भातील २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 12:19 PM

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला.अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात १६६.६ मिमी एवढाच पाऊस झाला.

इंदल चव्हाण

अमरावती - पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख लाभलेल्या या जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा १ जून ते सप्टेंबरपर्यंत अपेक्षित ७७७.९ मिमीच्या तुलनेत १२ जुलैपर्यंत सरासरी २५१.४ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात १६६.६ मिमी एवढाच पाऊस झाला. याची टक्केवारी ६८.१ आहे. वार्षिक २२.१ टक्केवारी आहे. यात अमरावती जिल्ह्यात सरासरी २५३ मिमीपैकी १५७ मिमी, अकोला २२४.८ पैकी १७५.५ मिमी, यवतमाळ २९५.१ पैकी १२६.५ मिमी, बुलडाणा २२०.४ पैकी २१४.३ मिमी, वाशीम २६३.९ पैकी १५९.५ मिलीमीटरच पाऊस झाला. याची टक्केवारी ६८.१ इतकी आहे. 

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याने सरासरी गाठली असून, १४ पैकी सात तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यांवर पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यांनी सरासरी गाठली असून, एकूण सातपैकी सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी एकाही तालुक्याने सरासरी गाठली नसून, केवळ चार तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी मानोरा माघारला असून, सर्व तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपैक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. याची टक्केवारी ६०.४ एवढी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी पाच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली असून सात तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपैक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची टक्केवारी ९७.२ इतकी आहे.

विभागातील 'या' तालुक्यांत अल्प पावसाची नोंद

तालुके          मिमी पाऊस       टक्के

भातकुली           ९४.८             ३९ तिवसा               ११८.४           ४९.५मोर्शी                 १२१,१           ४८.३वरूड               १०३.५           ३५.९दर्यापूर              ९७.९            ४५.८अंजनगाव सुर्जी    ८५.४         ४६.३मूर्तिजापूर          ८५.८           ३४.८यवतमाळ          ९४.७           ३१बाभूळगाव        ११.४             ३६.५कळंब             १०३.३            ३३.८दारव्हा            ११७.५           ४२.८दिग्रस             १००                ३५.८पुसद              १३२.२            ४९.६उमरखेड       १००.४            ३४.२महागाव         १०३.६            ३७.८केळापूर         ११६.१            ३७.३घाटंजी           १३५.९           ४३राळेगाव        १४५.६           ४६.१झरी जामणी  १३१.८             ४१.९मानोरा          १२६.१             ४९.७देऊळगाव राजा    ११०.२      ४७.६

आपत्तीजनक स्थितीत शेतकऱ्यांना मदतीवर मंथन  

विभागातील काही तालुक्यांची पावसाची स्थिती बिकट आहे. याबाबत प्रशासन दखलपात्र असून, अवघ्या आठ दिवसांत पावसाची स्थितीत सुधारणा न झाल्यास उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी यथोचित मदत करण्यात येईल. उपलब्ध पाणीसाठ्याचे देखील नियोजनावर मंथन केले जाईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊसYavatmalयवतमाळbuldhanaबुलडाणाwashimवाशिम