शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

भातात अळ्या, पाण्यात बेडूक, करपलेली पोळी!

By admin | Updated: December 23, 2014 22:56 IST

तालुक्यातील डोमा शासकीय शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भातात अळ्या, जळलेली पोळी, पिण्याच्या पाण्यात बेडूक, उघड्यावर अर्धपोट जेवण अन् फाटलेले ब्लँकेट अशा

डोमा आश्रम शाळेतील प्रकार
नरेंद्र जावरे - चिखलदरा
तालुक्यातील डोमा शासकीय शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भातात अळ्या, जळलेली पोळी, पिण्याच्या पाण्यात बेडूक, उघड्यावर अर्धपोट जेवण अन् फाटलेले ब्लँकेट अशा अनेक समस्यांनी सातशेपेक्षा अधीक मुला-मुलींना वेठीस धरले असल्याचे उघडकीस आले आहे.
राज्याच्या आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळांची बकाल अवस्था आहे. सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येत आहे. आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सत्य डोमा येथील आश्रम शाळेत पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग असून सातशेच्या जवळपास आदिवासी मुल-मुली निवासी आहेत. शनिवारी नेहमीप्रमाणे मुलांना सकाळी १०.३० वाजता जेवण देण्यात आले. जेवणात वांग्याची भाजी, दाळ, भात, जळालेली पोळी नेहमीप्रमाणे होती. वांग्याच्या भाजीत अळ्या निघाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. आश्रम शाळेला होणारा धान्य व भाजीपाल निकृष्ट व सडक्या दर्जाचा असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात लखन मुंगीलाल तोटे, देवीदास राजाराम बेठेकर, दिलीप मुन्ना कास्देकर, अंकुश रामोधिकार, रामूू धिकार, गजानन बेठेकर, लक्ष्मण कास्देकर, शारदा दहिकर, भागू सावलकर, महिमा मावस्कर यांनी तक्रार केली आहे.
अर्धपोटी जेवण
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जाण्यासोबत एक पोळी व वरण, भात असे अर्धपोटे जेवण दिल्या जात असल्याच्या कारणावरुन गत महिन्यात या विद्यार्थ्यांनी पायदळ धारणी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे कुच केली होती. सदर प्रकार माहिती होताच विद्यार्थ्यांना सेमाडोह येथे थांबवून प्रकल्प कार्यालयातर्फे त्यांची समजूत काढून आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे.
अंधाराचे साम्राज्य
सातशेच्या जवळपास पहिली ते बारावी पर्यंतचे मुल-मुली निवासी असताना एका खोलीत दीडशेवर विद्यार्थी झोपतात. रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यास त्यांना नेहमी अंधारातच रात्र काढावी लागते. जनरेटर, सौर उर्जेचे दिवे काही बेपत्ता वजा बंद अवस्थेत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अंधारात सर्प, विंचू पासून भिती असताना त्यावर दुर्लक्ष करण्यात आले. जारीदा आश्रम शाळेतील अस्वलाचा हमला विद्युत पुरवठा बंद असल्यामुळेच झाला होता हे विशेष.