शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय घरकुलांमध्ये शौचालयाचा अभाव

By admin | Updated: December 23, 2014 22:56 IST

ग्रामीण भागात असलेल्या तीन लाख ९५ हजार घरकुलामध्ये अद्यापही सुमारे २ लाख पाच हजार घरकुलांना शौचालयाची प्रतीक्षा आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शौचालय

अमरावती : ग्रामीण भागात असलेल्या तीन लाख ९५ हजार घरकुलामध्ये अद्यापही सुमारे २ लाख पाच हजार घरकुलांना शौचालयाची प्रतीक्षा आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शौचालय निर्मितीत जिल्हा माघारला जात आहे. याशिवाय स्वच्छतेविषयक जनजागृती नसल्याने संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संतांच्या जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबतीत पुरेशी जनजागृती होत नसल्याने शौचालय उभारणीत जिल्हा मागे पडत आहे.
केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण नुकतेच स्वच्छ भारत मिशन असे करण्यात आले आहे. वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी प्रोत्साहनपर रक्कम वाढवून ती बारा हजार रुपये करण्यात आली आहे. इंदिरा गांधी आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरातील स्वच्छता गृहासाठी वेगळी तरतूद आहे. त्यामुळे वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामांना वेग येईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात येत होती. अशातच मोजमाप व तपाणी आदी बाबीसाठी जास्त वेळ खर्च होत असल्याने तसेच या उपक्रमाची अंमलबजावणीसाठी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा असलेला उदासिनपणा यामुळे या योजनेकडेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. शासनाने शौचालयासाठी अनुदान बारा हजार रुपये केले असले तरी एवढ्या किंमतीत चांगले स्वच्छतागृह बांधणे अशक्य आहे. केंद्र शासनाने सन २००३ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या वैयक्तिक शौचालय बांधकामास प्राधान्य देण्यात आले होते. या अभियानाचे नाव सन २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान करण्यात आले. योजनाचे नावे बदले परंतु स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छतागृहाच्या संख्येत पाहिजे तशी वाढ झाली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामाकरिता प्रोत्साहनपर अनुदान दिले जात होते. पण तांत्रिक अडचणीमुळे या योजनेत लोकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता तर अनुदानच बंद केले आहे. अनुदानाची पूर्ण रक्कम स्वच्छ भारत मिशनकरिता केंद्र शासनाकडून मंजुर निधीत दिली जात आहे. वैयक्तिक शौचालयासाठी केंद्र शासनाकडून नऊ हजार रुपये आणि राज्य शासनामार्फत तीन हजार रुपये अशा प्रकारे ७५ टक्के केंद्र व २५ टक्के राज्य हिस्सा मिळतो. गावपातळीवर आरोग्याबाबत चांगले वातावरण असावे, महिलांचा सन्मान राखला जावा हा या मागील उद्देश आहे. यासाठी सन २००५ पासून राज्यात पाणी पुरवठा योजनांसाठी हगणदारी मुक्तीचे धोरण स्वीकारण्यात आले. याच आधारावर पाणी पुरवठा योजनाचे प्रस्ताव तयार करण्यात आले. यानुसार कामे सुरू करताना सदर गावामध्ये ६० टक्के हगणदारी मुक्तीची अट टाकण्यात आली. याशिवाय दुसरा हप्ता देतेवेळी १०० टक्के हगणदारी मुक्त असणे या अटी होत्या. मात्र जिल्ह्यात पाणी टंचाईगस्त गावांमध्ये याचा फार फरक पडला नाही. सध्या ही अट साठ टक्के करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)