शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगांव आर्वीतच होणार कृषीसमृद्धी केंद्र

By admin | Updated: August 18, 2016 00:02 IST

राज्याच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणारा तब्बल ७१० किमीच्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धि कॉरीडोर प्रकल्पांत स्मार्टसिटी जळगांव आर्वी येथेच होणार असून....

पालकमंत्र्यांनी केली जागेची पाहणी : -आता शासकीय भूखंडावरच साकारणार बिझनेस हब धामणगावरेल्वे : राज्याच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणारा तब्बल ७१० किमीच्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धि कॉरीडोर प्रकल्पांत स्मार्टसिटी जळगांव आर्वी येथेच होणार असून आता १४४ हेक्टरच्या शासकीय भूखंडातच हा हब साकारला जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केले.मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हायवे धामणगाव तालुक्यातील १५ गावांमधून जाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी दुपारी तालुक्यातील दोन ठिकाणांची पाहणी केली. यवतमाळ-धामणगाव मार्गावरील सावळा फाटा येथे उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. जागेची पाहणी केल्यानंतर जळगांव आर्वी येथील औद्योगिक क्षेत्राची सुद्धा पालकमंत्र्यांनी पाहणी केली. मालधक्क्याचा दळणवळणासाठी वापरअमरावती : परिसरातील १४४ हेक्टरमध्ये शासकीय बिझनेस हब साकारला जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पाकरिता जमिनीची कमतरता भासल्यास तिवसा मार्गावरील ६८ एकर प्रकल्पामुळे जळगांव औद्योगिक परिक्षेत्राचे रूप पालटणार असून परिसरातील शेकडो लोकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. धामणगाव-जळगांव आर्वी हा रस्ता सुद्धा ६ पदरी करून त्यामार्गे धामणगाव रेल्वे येथील मालधक्क्याचा उपयोग दळणवळणासाठी केला जाणार आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकल्पात आता शासनाने आधी शासकीय जमिनचा वापर करुन हब साकारण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. जळगाव आर्वी येथील औद्योगिक परिक्षेत्राची पाहणी करताना जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा नियोजन अधिकारी काळे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार चंद्रभान कोहरे, राजगडकर, प्रवीण देसली, दिनेश विधाते, मंगेश कवाडे,श्रीकांत घुगे, जळगांव आर्वी येथील धीरज मुडे आदी उपस्थित होते.दत्तापूर पांदण रस्ता महामार्गाला जोडणारजळगाव आर्वी ते दत्तापूर या पांदण रस्त्याचा विकास करण्यात येणार असून त्या रस्त्याला महामार्गाशी जोडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी दिली. या कॉरीडोर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.