शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

कोकण, पुणे पावसात अव्वल; मराठवाडा माघारला, धरणांतील जलसाठा ५७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 15:52 IST

- प्रदीप भाकरेअमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे आणि कोकणातील प्रकल्पसाठा ७० ते ९० टक्क्यांवर पोहोचला असताना, मराठवाडा मात्र अजूनही तहानला असल्याचे चित्र आहे.पावसाळ्याचे उणेपुरे ४० दिवस शिल्लक असताना राज्यातील ३,२६६ प्रकल्पांमध्ये १९ आॅगस्टअखेर केवळ ५७.६० टक्के पाणी साचले आहे.गतवर्षी हेच ...

- प्रदीप भाकरे अमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे आणि कोकणातील प्रकल्पसाठा ७० ते ९० टक्क्यांवर पोहोचला असताना, मराठवाडा मात्र अजूनही तहानला असल्याचे चित्र आहे.पावसाळ्याचे उणेपुरे ४० दिवस शिल्लक असताना राज्यातील ३,२६६ प्रकल्पांमध्ये १९ आॅगस्टअखेर केवळ ५७.६० टक्के पाणी साचले आहे.गतवर्षी हेच प्रमाण ५२.२० टक्के असे होते.तूर्तास अमरावती प्रदेशातील ४४५ प्रकल्पांमध्ये ४३.४६ टक्के, कोकण प्रदेशातील १७६ प्रकल्पांमध्ये ९०.१३ टक्के, नागपूर प्रदेशातील ३८५ प्रकल्पांमध्ये ३९.३७ टक्के, नाशिक प्रदेशातील ५७१ प्रकल्पांमध्ये ५३.२० टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ७९.१५ टक्के, तर मराठवाड्यातील ९६४ प्रकल्पांमध्ये केवळ २०.८५ टक्के जलसाठा आहे.राज्यातील १४२ मोठ्या प्रकल्पांमध्ये ६५.१० टक्के, २५८ मध्यम प्रकल्पांमध्ये ४६.५५ टक्के व २८६६ लघूप्रकल्पांमध्ये अवघा ३२.६७ टक्के जलसाठा आहे. अन्य पाच प्रदेशांच्या तुलनेत मराठवाडा सन २०१६ प्रमाणे दुष्काळाशी झगडत आहे. मराठवाड्यातील ४५ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२.१६ टक्के, ८१ मध्यम प्रकल्पांमध्ये २०.५० टक्के व ८३८ लघू प्रकल्पांमध्ये अवघा १७.५७ टक्के जलसाठा आहे. एकूणच मराठवाडा प्रदेशाची जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. 

मोठ्या प्रकल्पातील जलसाठाकाटेपूर्णा (अकोला)    - ४९.७२वाण (अकोला)    - ६७.००उर्ध्व वर्धा (अमरावती)    - ४६.३५खडकपूर्णा (बुलडाणा)    - ०नळगंगा (बुलडाणा)    - १४.१९अरुणावती (यवतमाळ)    - ८१.६५पूस (यवतमाळ)    - ९९.९८नांद (नागपूर)    - ७५.४६गोसे खुर्द (भंडारा)    - ३०.७५निम्न वर्धा (वर्धा)    - २८.८७असोळा मेंढा (चंद्रपूर)    - ९२.८२दिवा (गडचिरोली)    - ८१.४१

९०८ गाववाड्यांमध्ये टँकरवारी१३ आॅगस्टअखेर राज्यातील ५६७ गावे व ३४१ वाड्यांमध्ये ५९३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात नाशिक विभागात १०२, पुणे विभागात १४, मराठवाड्यात ४३५, तर अमरावती विभागातील बुलडाण्यात ४२ टँकरने पाणी पोहोचविले जात आहे. यात ७५ शासकीय व ५१८ खासगी टँकरचा समावेश आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रDamधरण