शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
4
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
5
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
6
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
7
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
8
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
9
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
10
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
11
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
12
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
13
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
14
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
15
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
16
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
17
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
18
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
19
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
20
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक

कोकण, पुणे पावसात अव्वल; मराठवाडा माघारला, धरणांतील जलसाठा ५७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 15:52 IST

- प्रदीप भाकरेअमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे आणि कोकणातील प्रकल्पसाठा ७० ते ९० टक्क्यांवर पोहोचला असताना, मराठवाडा मात्र अजूनही तहानला असल्याचे चित्र आहे.पावसाळ्याचे उणेपुरे ४० दिवस शिल्लक असताना राज्यातील ३,२६६ प्रकल्पांमध्ये १९ आॅगस्टअखेर केवळ ५७.६० टक्के पाणी साचले आहे.गतवर्षी हेच ...

- प्रदीप भाकरे अमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे आणि कोकणातील प्रकल्पसाठा ७० ते ९० टक्क्यांवर पोहोचला असताना, मराठवाडा मात्र अजूनही तहानला असल्याचे चित्र आहे.पावसाळ्याचे उणेपुरे ४० दिवस शिल्लक असताना राज्यातील ३,२६६ प्रकल्पांमध्ये १९ आॅगस्टअखेर केवळ ५७.६० टक्के पाणी साचले आहे.गतवर्षी हेच प्रमाण ५२.२० टक्के असे होते.तूर्तास अमरावती प्रदेशातील ४४५ प्रकल्पांमध्ये ४३.४६ टक्के, कोकण प्रदेशातील १७६ प्रकल्पांमध्ये ९०.१३ टक्के, नागपूर प्रदेशातील ३८५ प्रकल्पांमध्ये ३९.३७ टक्के, नाशिक प्रदेशातील ५७१ प्रकल्पांमध्ये ५३.२० टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ७९.१५ टक्के, तर मराठवाड्यातील ९६४ प्रकल्पांमध्ये केवळ २०.८५ टक्के जलसाठा आहे.राज्यातील १४२ मोठ्या प्रकल्पांमध्ये ६५.१० टक्के, २५८ मध्यम प्रकल्पांमध्ये ४६.५५ टक्के व २८६६ लघूप्रकल्पांमध्ये अवघा ३२.६७ टक्के जलसाठा आहे. अन्य पाच प्रदेशांच्या तुलनेत मराठवाडा सन २०१६ प्रमाणे दुष्काळाशी झगडत आहे. मराठवाड्यातील ४५ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२.१६ टक्के, ८१ मध्यम प्रकल्पांमध्ये २०.५० टक्के व ८३८ लघू प्रकल्पांमध्ये अवघा १७.५७ टक्के जलसाठा आहे. एकूणच मराठवाडा प्रदेशाची जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. 

मोठ्या प्रकल्पातील जलसाठाकाटेपूर्णा (अकोला)    - ४९.७२वाण (अकोला)    - ६७.००उर्ध्व वर्धा (अमरावती)    - ४६.३५खडकपूर्णा (बुलडाणा)    - ०नळगंगा (बुलडाणा)    - १४.१९अरुणावती (यवतमाळ)    - ८१.६५पूस (यवतमाळ)    - ९९.९८नांद (नागपूर)    - ७५.४६गोसे खुर्द (भंडारा)    - ३०.७५निम्न वर्धा (वर्धा)    - २८.८७असोळा मेंढा (चंद्रपूर)    - ९२.८२दिवा (गडचिरोली)    - ८१.४१

९०८ गाववाड्यांमध्ये टँकरवारी१३ आॅगस्टअखेर राज्यातील ५६७ गावे व ३४१ वाड्यांमध्ये ५९३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात नाशिक विभागात १०२, पुणे विभागात १४, मराठवाड्यात ४३५, तर अमरावती विभागातील बुलडाण्यात ४२ टँकरने पाणी पोहोचविले जात आहे. यात ७५ शासकीय व ५१८ खासगी टँकरचा समावेश आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रDamधरण