शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

सर्वसामान्यांना न्याय; काँग्रेस हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:00 IST

केंद्र व राज्यातील सरकारने घोषणा, आश्वासनांशिवाय काहीच केलेले नाही. त्यांच्याविरोधात कुणी बोलले, तर आवाज दाबण्यात येतो. सर्वसामान्यांना न्याय केवळ काँग्रेसच देऊ शकते. कार्यकर्त्यांनी भाजपची जुलमी राजवट हद्दपार करण्यासाठी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाणांची ग्वाही : जिल्हा काँग्रेस कमिटीचे ‘व्हिजन २०१९’ शिबिर, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

आॅनलाईन लोकमतअमरावती : केंद्र व राज्यातील सरकारने घोषणा, आश्वासनांशिवाय काहीच केलेले नाही. त्यांच्याविरोधात कुणी बोलले, तर आवाज दाबण्यात येतो. सर्वसामान्यांना न्याय केवळ काँग्रेसच देऊ शकते. कार्यकर्त्यांनी भाजपची जुलमी राजवट हद्दपार करण्यासाठी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे केले.जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘व्हिजन २०१९’ अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर येथील तेलाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी खा. चव्हाण मार्गदर्शन करीत होते. भाजपने निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. या शासनाच्या काळात शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी, बेरोजगार युवकांच्या समस्यांत भर पडली आहे. शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफाधारित हमीभावाचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात हमीपेक्षा कित्येक पटीने कमी भाव असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. नोकरभरतीत कपात करून बेरोजगारांच्या आशा धुळीस मिळविल्या. हे सरकार नक्की कुणासाठी काम करते, असा सवाल चव्हाण यांनी केला.काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात रोजगार निर्मितीसह शेतमालास उत्पादन खर्चावर हमीभाव याबाबत ठाम भूमिका पक्षाने घेतली आहे. सर्वसामान्यांना विश्वास देण्याचे काम आता कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. यशोमती ठाकूर यांनी शिबिराला संबोधित केले. व्यासपीठावर विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आ. अब्दुल सत्तार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी आमदार केवलराम काळे, नरेशचंद्र ठाकरे, सुलभा खोडके, पुष्पा बोंडे, शहराध्यक्ष किशोर बोरकर, श्याम उमाळकर, बंडू सावरबांधे आदी उपस्थित होते. संचालन आ. वीरेंद्र जगताप यांनी केले. शिबिराला आजी-माजी आमदार, खासदार, जि.प., पं.स. आजी-माजी पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तीन कारणांमुळेच विकासदर घटला -पृथ्वीराज चव्हाणकेंद्र व राज्यातील भाजप सरकारने चार वर्षांच्या कार्यकाळात आश्वासनांची पूर्तता केली नाही; उलट नोटाबंदी, घिसाडघाईने लागू केलेली जीएसटी आणि शेतकºयांबाबत नकारात्मक भूमिका या तीन कारणांमुळे देशाचा विकासदर कधी नव्हे एवढा खालावल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सरकारच्या जनहितविरोधी धोरणांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसचे हात मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.थापाड्यांना त्यांची जागा दाखवून द्या -यशोमती ठाकूरखोटे बोला, पण रेटून बोला - म्हणजे ते खरे भासेल, असे भाजप सरकारचे धोरण आहे. या खोटे बोलणाºया मोदी आणि फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. त्या म्हणाल्या, रविवारी रामनवमी आहे. आम्हीही रामाला मानतो; परंतु राजकारण करीत नाही. गोरगरीब जनतेला फसविणारा काँग्रेस पक्ष नव्हे; हे काम मोदी शासनाचे आहे. निवडणुकीत मतदानातून त्यांना चोख उत्तर द्या, असे त्या म्हणाल्या.काँग्रेसला अमरावतीची नेहमीच साथ -बाळासाहेब थोरातसुरुवातीपासूनच काँग्रेसला साथ देणारा जिल्हा म्हणून अंबानगरीची ओळख आहे. त्याची चुणूक या शिबिराच्या नियोजनावरून दृष्टीस पडली. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि त्यांचे सहकारी आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांच्या एकजुटीची ही पावती असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. जिल्हा काँग्रेसच्या नियोजनबद्ध धोरणामुळे जिल्ह्यात काँग्रेसचा जनाधार वाढत असल्याचे गौरवोद्गार थोरात यांनी काढले.भाजप सर्व पातळ्यांवर अपयशी -बबलू देशमुखकेंद्र व राज्यातील भाजप सरकारने आश्वासनांच्या लोणकढी थापा मारण्याचे काम केले. चार वर्षांत शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व जनतेला अडचणीत टाकण्याचे काम केले आहे. शेतकºयांना कर्जमाफी घोषित केली; पण हाती काहीच आले नाही. महागाई वाढली. सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारचे दिवस आता भरले आहेत. शेतकरी व सर्वसामान्याना न्याय केवळ काँग्रेसच देऊ शकते, असे बबलू देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले.