शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राज्य कर्मचा-यांचे काऊंटडाऊन सुरू, आरक्षण लाभाचे प्रकरण, १५ वर्षांपासून वर्ग १ ते ४ ची माहिती गोळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 17:44 IST

सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या बळावर उच्चपदावर जाणा-या राज्य सेवेतील कर्मचा-यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असून, कोणत्याही क्षणी पदोन्नतीतून खाली खेचण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण माहिती मागविण्यास प्रारंभ केले आहे. गत १५ वर्षांपासून वर्ग १ ते ४ च्या कर्मचा-यांची माहिती गोळा केली जात आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या बळावर उच्चपदावर जाणा-या राज्य सेवेतील कर्मचा-यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असून, कोणत्याही क्षणी पदोन्नतीतून खाली खेचण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण माहिती मागविण्यास प्रारंभ केले आहे. गत १५ वर्षांपासून वर्ग १ ते ४ च्या कर्मचा-यांची माहिती गोळा केली जात आहे.राज्यात वर्ग १ ते ४ मध्ये शासनसेवेतील कर्मचा-यांना पदोन्नतीचे धोरण राबविण्यात आले. २५ मे २००४ पासून राज्य सेवेतील कर्मचा-यांना जातीनिहाय नोकरीत आरक्षण लागू झाले. त्यानुसार राज्यातील वर्ग १ च्या ५० हजार, तर वर्ग २ ते ३ च्या पदोन्नतीतील कर्मचा-यांची संख्या पाच लाखांच्या आतमध्ये आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सेवेत असताना पदोन्नतीचा लाभ घेणा-याविरूद्ध निर्णय दिल्याने या निर्णयाविरूद्ध शासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पदोन्नतीच्या विरूद्ध जाण्याची दाट शक्यता बळावली असल्याने राज्य शासनाने त्यांच्या विविध शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, महामंडळे आदी आस्थापनांवर असलेल्या वर्ग १ ते ४ च्या कर्मचा-यांनी २००४ पासून आरक्षणाच्या बळावर पदोन्नतीचा लाभ घेतला, अशा कर्मचा-यांची माहिती त्वरित जमा करून विभागप्रमुखांनी मंत्रालयात सादर करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने २१ जानेवारी २०१८ रोजी जारी केले आहे. तसेच या माहितीस कालमर्यादा ठरवून दिल्यामुळे सध्या आरक्षणामुळे पदोन्नत झालेल्या कर्मचा-यांची नोंदी व माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याचे चित्र आहे. 

जातीनिहाय माहिती गोळासन २००४ ते २०१७ पर्यंत कर्मचा-यांनी ज्या जाती संवर्गातून आरक्षणाच्या बळावर पदोन्नती मिळविली अशा गट ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील कर्मचा-यांची टक्केवारी आरक्षणाबाबत माहिती देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. गट ‘अ’ च्या वरच्या टप्प्यावरील पदे याबाबतसुद्धा माहिती मागविण्यात आली आहे. परिणामी वर्ग एकच्या अधिका-यांना याचा फटका बसणार असल्याचे दिसून येते.

...तर मोठे फेरबदलसध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सेवेतील कर्मचा-यांची पदोन्नती जातीच्या आधारावर नव्हे, तर सेवा ज्येष्ठतेनुसार होत आहे. त्यामुळे तूर्तास आरक्षण कोट्याला ब्रेक लागलेला असला तरी सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निर्णय लक्षात घेता राज्य शासनाने वर्ग १ ते ४ पर्यंतच्या सर्व कर्मचा-यांची २००४ ते २०१७ पर्यंतचे पदोन्नतीबाबतचे अपडेट मागविल्याने भविष्यात लाखो कर्मचा-यांना खालच्या पदावर येण्याची वेळ येणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका सन- २०११ पासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचा-यांना बसण्याची दाट शक्यता आहे. काही जातीच्या कर्मचा-यांना ४ ते ५ वर्षांत पदोन्नतीचा लाभ मिळाल्याने ते खालच्या पदावर येण्याचे संकेत आहे.

टॅग्स :reservationआरक्षणMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावतीEmployeeकर्मचारी