शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी आयोगाचा कारभार सुधारा, अन्यथा आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:13 IST

अमरावती : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी चालविलेला खेळ थांबवून कारभार सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ...

अमरावती : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी चालविलेला खेळ थांबवून कारभार सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेतून दिला आहे.

एमपीएससीने १४ मार्च रोजी आयोजित परीक्षा आता २१ मार्च रोजी घेण्याचे नियोजन चालविले आहे. मात्र, यापूर्वी वर्षभरात पाच वेळा परीक्षा स्थगित करण्याचा खेळखंडोबा शासनाने थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. काही तरुणांनी वयांची मर्यादा ओलांडली आहे, तरीही एमपीएससी वेळेत परीक्षा घेत नाही. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांत समन्वयाचा अभाव आहे. याचा फटका स्पर्धा परीक्षार्थ्यांना बसत आहे. एमपीएससी आयोगाकडे दोनच अधिकारी कार्यरत असून, येथे सुमारे १० अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. आयोगाचे अध्यक्ष आणि शासन यांच्यात वाद असल्याची बाबही यावेळी विश्वकर्मा यांनी लक्षात आणून दिली. शासनाकडून आयोजित विविध परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्या, अशी मागणी त्यांनी केली. महापोर्टलने यापूर्वी घेतलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले असून, तरीही चौकशी नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही, असा आरोप वंचितने केला आहे. मराठा आरक्षणाच्या नावे एमपीएससी परीक्षांची बोळवण चालविली असून, हा विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याची बाब आहे, असा आरोप करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र पातोडे, अलीम पटेल, सिद्धार्थ गायकवाड, नीशा शेंडे, शैलेश गवई, विद्या वानखडे आदी उपस्थित होते.