शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सात मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 1:38 AM

धारणी तालुक्यात बुधवार सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. येथे धारणी महसूल मंडळात १०५.२ मिमी, धूळघाट ९६.२ मिमी, हरिसाल ११५ मिमी पावसाची नोंद झाल्याने दुपारपासून गडगा, सिपना, तापी या नद्यांसह खापरा, खंडू व अलई नाले ओव्हरफ्लो झालेत.

ठळक मुद्देनुकसानाचे पंचनामे सुरू : १२ तारखेपर्यंत हलक्या, मध्यम पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोर्शी व धारणी तालुक्यातील सात महसूल मंडळात गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली. मोर्शी शहरात दमयंती नदीचे पाणी शिरल्याने किमान ७०० कुटुंबे बाधित झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी रात्री या भागाचा दौरा करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. गुरुवारी सकाळी पालकमंत्री अनिल बोंडे यांनीदेखील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.धारणी तालुक्यात बुधवार सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. येथे धारणी महसूल मंडळात १०५.२ मिमी, धूळघाट ९६.२ मिमी, हरिसाल ११५ मिमी पावसाची नोंद झाल्याने दुपारपासून गडगा, सिपना, तापी या नद्यांसह खापरा, खंडू व अलई नाले ओव्हरफ्लो झालेत. त्यामुळे अनेक शेतात पाणी साचून नुकसान झाले. गुरुवारीदेखील पाऊस सुरूच असल्याने नदी-नाले दुथडी वाहत आहेत. मोर्शी येथे बुधवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. या महसूल मंडळात १२७ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे शिरखेड ७४ मिमी, अंबाडा १२० मिमी व हिवरखेड मंडळांत ९१ मिमी पावसाची नोंद झाली. मुसळघार पावसाने मोर्शी शहरातून वाहणाऱ्या दमयंती नदीच्या महापुराने किमान ७०० कुटुंबे बाधित झालीत. त्यांना सुरक्षितस्थळी पोहचविण्यात आले आहे. तेथे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी भेटी देऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यात १ जून ते ५ आॅगस्ट दरम्यान पावसाची ६७१ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६९७.१ मिमी पावसाची नोंद झाली. ही १०३.९ मिमी टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या ८५.६ टक्के पाऊस आतापर्यंत झालेला आहे. यामध्ये धारणी तालुक्यात सरासरीच्या १२५ टक्के, चिखलदरा ११९, चांदूर बाजार १४०, अचलपूर १०४, धामणगाव १२१ व चांदूर रेल्वे तालुक्यात सरासरीच्या १०८.४ टक्के पावसाची नोंद झाली. सर्वात कमी ६०.५ टक्के पाऊस भातकुली तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात येत्या ८ तारखेपर्यंत पावसाची अशीच स्थिती राहील. १२ पर्यंत विखुरल्या स्वरुपात हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.हवामानाची स्थितीओरीसावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. सोबतच दक्षिण ओरिसा वर ७.६ उंचीवर चक्राकार वारे वाहत असून ते नैऋत्येकडे झुकलेले आहे. पूर्व-पश्चिम कमी अधिक दाबाची शियर झोन मध्य भारतात सक्रिय आहे. दक्षिण गुजरात ते केरळ किणारपट्टीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती कायम आहे. यामुळे पावसाच्या अंदाजात बदल झाला आहे. पुढील तीन चार दिवसांत विदर्भात तसेच मध्यप्रदेशात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.उर्ध्व वर्धा प्रकल्पात ९० टक्के जलसाठाउर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या मोर्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे उर्ध्व वर्धा प्रकल्पात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ८९.७८ टक्के जलसाठ्याची नोंद झाली. सद्यस्थितीत २३६ घनमीटर प्रतिसेंकद अशी आवक प्रकल्पात सुरू आहे. मध्यप्रदेशात जोरदार पाऊस झाल्याने आठ दिवसांत प्रकल्पाच्या साठ्यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही स्थिती आणखी आठवडाभर राहिल्यास प्रकल्पाची दारे उघडले जाण्याची शक्यता आहे. यंदा रबी सिंचनासाठी पाणी मिळण्याच्या आशने शेतकरी सुखावला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर