शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

हरिसाल होणार ‘डिजिटल व्हिलेज’

By admin | Updated: December 28, 2015 00:24 IST

मेळघाटला कुपोषणाचा लागलेला कुप्रसिद्ध कलंक दूर करण्यासाठी राज्य शासनाने विकास आराखडा तयार केला आहे.

मुख्यमंत्र्यांची घोषणा : राज्यातील ५० गावांमध्ये संकल्पना राबवूअमरावती : मेळघाटला कुपोषणाचा लागलेला कुप्रसिद्ध कलंक दूर करण्यासाठी राज्य शासनाने विकास आराखडा तयार केला आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासकीय कामकाज आदी सुविधा या एका क्लिकवर मिळेल, त्यानुषंगाने मेळघाटातील हरिसाल हे गाव देशातील पहिले ‘डिजिटल व्हिलेज’ साकारू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.बडनेरा मार्गालगतच्या दसरा मैदानावर आयोजित राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरण, केंद्रीय मार्ग निधीतील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते अध्यक्षस्थावरून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून केंद्रीय भूतल परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार रामदास तडस, आ.सुनील देशमुख, आ. रवी राणा, आ.अनिल बोंडे, आ. श्रीकांत देशपांडे, आ. यशोमती ठाकूर, आ. रमेश बुंदिले, आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, महापौर चरणजित कौर नंदा, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, निवेदिता चौधरी, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, भाजपचे गटनेता संजय अग्रवाल, माजी महापौर अशोक डोंगरे, मिलिंद चिमोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, शंकरराव हिंगासपुरे, दिनेश सूर्यवंशी, माजी आ. साहेबराव तट्टे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असल्यामुळे राज्यात रस्ते विकासाचे जाळे विणले जात आहे. त्यामुळे या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येईल, तेव्हा विदर्भात सर्वाधिक रस्ते राज्यमार्ग असल्याचा नामोल्लेख होईल, असे ते म्हणाले. नागपूर- मुंबई एक्सप्रेस वे हा फायबर आॅप्टिकने साकारला जाणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील १४ जिल्हे या कम्युनिकेशन एक्सप्रेसशी जोडले जाणार आहेत. या एक्सप्रेस वे निर्मितीत ज्या शेतकऱ्यांची जमीन जाईल, त्यांना पार्टनर म्हणून सामावून घेतले जाईल, ही बाब मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. मुंबई एक्सप्रेस वे हा मार्ग सन २०१९ मध्ये पूर्ण होऊन नागरी वाहतुकीसाठी खुला करू, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मेळघाटच्या कुपोषणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, मेळघाटातून कुपोषण कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असल्याचे निक्षून सांगितले. एकेकाळी कुपोषणाने ग्रस्त असलेले हरिसाल हे दुर्गम गाव ‘डिजिटल व्हिलेज’ साकारण्याचे ठरविले आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासकीय कामकाज, मूलभूत सुविधा, रस्ते विकास तसेच देशपातळीवरील माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. त्यामुळे हरिसाल हे देशातील पहिले ‘डिजिटल व्हिलेज’ ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. हरिसाल येथे अत्याधुनिक सोयी सुविधा पुरविताना इंटरनेटचे जाळे विणले जाणार आहेत. तसेच राज्यात ५० गावे ही ‘स्मार्ट व्हिलेज’ तयार करण्याचे नियोजन असून त्यानुसार शासनाची तयारी आहे. प्रत्येक गाव हे मुख्य रस्त्यांसोबत जोडले जाणार आहे.बेलोरा विमानतळाचा रखडलेला विकास पूर्ण करूजिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाचा विकास लवकरच मार्गी लावू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले. बेलोरा विमानतळावर लवकरच विमानसेवा सुरू करण्याचे राज्य शासनाचे मानस आहे. विमानतळाचे विस्तारीकरण, विकास कामे पूर्ण करण्यासाठी शासन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार. विमानतळाच्या विस्ताकरणाचा विषय पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आ. सुनील देशमुख, खा. आनंदराव अडसूळ यांनी मनोगतातून मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिला, हे विशेष.जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांना समृध्द करणारी ठरलीभूजलस्तर वाढविणे आणि सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी समृध्द ठरली आहे. ‘मागेल त्या शेततळे’ त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. गाव, खेड्यात पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. परिणामी दुष्काळजन्य परिस्थितीतही शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार योजनेतून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यातून पाणीपुरवठा करणे सुकर झाले आहे. या योजनेमुळे भूजलस्तर वाढला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगतातून व्यक्त केला.