शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कापूस खरेदी करण्यास मुहूर्त मिळेना

By admin | Updated: October 24, 2016 00:27 IST

दिवाळीचा सण अवघा आठवडाभरावर आला आहे. तरीही अद्याप जिल्हाभरात सीसीआय किंवा पणनची कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत.

उदासीनता : खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूटअमरावती : दिवाळीचा सण अवघा आठवडाभरावर आला आहे. तरीही अद्याप जिल्हाभरात सीसीआय किंवा पणनची कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे ही खरेदी केंद्रे केव्हा सुरू होतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खासगी व्यापारी कमी भावात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करीत आहेत. यावर्षी खरीप पिकासाठी पोषक पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवार चांगलेच बहरले आहे. परंतु परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे सोयाबीन व उडीद पिकाचे नुकसान झाले. या पावसाचा कपाशीला फायदा झाला. जिल्ह्यात दरवर्षी सात ते साडेसात हेक्टरवर खरीप पेरणी करण्यात येते. त्यामध्ये कापूस, सोयाबीनचे क्षेत्र अधिक असते. यंदा १ लाख लाख १३ हजार ९२ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली होती. त्यातच यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे कापूस उत्पादनात वाढ होणार असल्याची आशा शेतकऱ्यांना आहे. वास्तविक पाहता दरवर्षी दसऱ्याला शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. या खरेदी केंद्रावर शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी नऊन दिवाळी साजरी करतात. परंतु यंदा दसरा होऊन दोन आठवड्याचा कालावधी उलटून गेला असताना देखील शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. याचाच फायदा खासगी व्यापारी घेऊन ते शेतकऱ्यांकडील कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत. सणासुदीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात कापसाची विक्री करीत आहेत. राज्यात फेडरेशन व सीसीआयच्यावतीने कापसाची खरेदी करण्यात येते. सीसीआयने कापूस खरेदीची शासनाकडे परवानगी मागितली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत परवानगी मिळून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परंतु तोपर्यंत हजारो क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकरी विरोधी भाजप सरकारचे धोरण आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. सोयाबीनला २७०० रूपये हमीभाव देणे गरजेचे आहे. शासन सोयाबीनला हमीभाव व कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. - वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव रेल्वेअच्छे दिनची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्यासाठी कापसाला चांगला हमीभाव जाहीर करावा, विविध संकटाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव द्यावा, ज्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबू शकेल. - उमेश कावरे, शेतकरीतीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहे. यंदा कापसाचे पीक समाधानकारक आहे. शासनाकडून कापसाला योग्य भाव दिल्यास खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, त्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा व कापूस खरेदी केंद्र सुरू करावे.- विलास रेहपांडे,शेतकरी