शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार लाख शेतकरी दुष्काळग्रस्त

By admin | Updated: December 8, 2014 22:27 IST

मागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आहे. १९८६ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकरी कुटुंबांचे ७ लाख ७६ हजार

प्रचलित निकषानेच मदत : १९८६ गावांमधील ७ लाख हेक्टरपेक्षा अधिक खरीप क्षेत्र बाधित
गजानन मोहोड - अमरावती
मागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आहे. १९८६ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकरी कुटुंबांचे ७ लाख ७६ हजार २५४ हेक्टरमधील खरिप पिके पावसाअभावी उद्ध्वस्त झाली आहेत. दरवर्षीच्या दुष्काळाच्या मालिकेने आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर जगावे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
नैसर्गिक आपत्तींमुळे कोलमडलेल्या जिरायती व बागायती, अल्प, अत्यल्प व कमालभूधारक शेतकऱ्यांना, बागाईतदारांना सावरण्यासाठी तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. यावर्षी जिल्ह्यातील १४ ही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्यामुळे शासनाने आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना प्रचलित निकषांसोबत आर्थिक मदत देण्याची गरज आहे.
गेल्या वर्षी खरिप हंगामात सरासरीपेक्षा १५० टक्के अधिक पाऊस, परतीचा पाऊस यामुळे खरिपाचा हंगाम गारद होऊन सरासरी ५० ते७० टक्क्यांनी उत्पादन घटले. जून महिन्यापासून पावसाने दीड महिना दडी मारली. त्यामुळे खरिपाची पेरणी २ महिने उशिरा झाली. परिणामी सोयाबीनला वाढीसाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर, शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाची दडी यामुळे ृसरासरी उत्पन्न ७० ते ८० टक्क्यांनी घटले. त्यानंतर सगळी मदार रबीवर असताना जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे हरभऱ्याची उगवण देखील ५० टक्क्यावर आली. आता तर पेरणीचा कालावधी आटोपला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सरासरी १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ८६ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी झाली आहे. ही एकूण पेरणी क्षेत्राच्या ५८ टक्के आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने बाजारपेठा मंदावल्या आहेत. आर्थिक विवंचनेतून जिल्ह्यात या वर्षात १०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी १६ शेतकरी आत्महत्या एकट्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आहेत. एकूणच शेतकऱ्यांची स्थिती विदारक असल्याचे दिसते. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ठोस उपाय व्हायला हवेत. (प्रतिनिधी)