शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

देशात पहिल्यांदा तिरंग्याला सलामीने सुरू झाला शंकरपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 13:03 IST

इंग्रजांविरुद्ध रणनीती, स्वातंत्र्यानंतर कापूस उत्पादकांचे आंदोलनही

बहिरम/परतवाडा : विदर्भातील सर्वांत प्रसिद्ध असलेल्या व सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम यात्रेत शनिवारपासून मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. देशात पहिल्यांदा तिरंग्याला सलामी देत शेतकऱ्यांचा हा उत्सव सुरू झाला.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवरील बहिरम यात्रा मागील एक महिन्यापासून लाखो भक्तांच्या दर्शन व भेटीने फुलली आहे. शनिवार, रविवार दोन दिवस लाखांवर असलेली गर्दी, त्यासाठी प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त आणि आवश्यकतेनुसार वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शनिवारपासून प्रहार संघटनेतर्फे लाखो रुपयांचे बक्षीस असलेली शंकरपट स्पर्धा सुरू झाली आहे. ध्वजपूजन परतवाडा येथील डॉ. प्रभू जवंजाळ यांनी केले.

स्वातंत्र्यपूर्व इतिहासात इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य आंदोलनाचे बीज बहिरम येथूनच पेरले गेले. स्वातंत्र्यानंतर १९७५ मध्ये एकाधिकारात कापसाच्या राज्यबंदीची बंधने तोडण्यासाठी आंदोलन बहिरम येथे झाले. त्याकाळी कापूस आंदोलनात गोळीबार करण्यात आला होता. त्यात कापूस उत्पादक तथा शेतकरी नेते विठ्ठलराव दुतोंडे शहीद झाले. बहिरमच्या परिसरातच देशाच्या महत्त्वाच्या क्रांतिकारकांच्या गोपनीय बैठका होत होत्या. स्वातंत्र्यलढ्याचे गनिमी कावे येथेच आखले जात होते. वऱ्हाडातील रणनीती याच मातीत पूर्णत्वास जात होती. या सर्व क्रांतिकारकांचा वावर मोठ्या प्रमाणात बहिरम परिसरात होता. त्यांच्या रक्ताने येथील भूमी पावन झाली आहे. संत गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने येथील नवसासाठी बोकडबळी प्रथा बंद झाली.

शहिदांना नमन, बहिरम एक आदर्श यात्रा

शहिदांना नमन म्हणून अचलपूर मतदारसंघाचे आ. बच्चू कडू यांनी शहीद बहिरम पुढील पिढीसाठी एक आदर्श व्हावे म्हणून बहिरम एक आदर्श यात्रा नावारूपास आणली. याकरिता गेले दहा वर्षे अनेक शासकीय, निमशासकीय कार्यक्रम बहिरम यात्रेत सुरू करण्यात आले.

शेती साहित्य, पेरणीचे नियोजन, बी-बियाणे

शेतातील पिके बाहेर निघाली, धान्याची विक्री झाली की, बहिरमची यात्रा सुरू होते. त्याचदरम्यान पुढच्या वर्षीच्या पिकाचे नियोजन, बी-बियाणे यावरसुद्धा या यात्रेत पूर्वी चर्चा व्हायची. शेती साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीला यायचे. ही परंपरा आजसुद्धा कायम आहे.

रक्तपात नव्हे, रक्तदान आदर्श संदेश

यात्रेदरम्यान प्रहार संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर सुरू आहे. शंकरपटात कुठल्याच प्रकारचा रक्तपात न होता एक आदर्श उपक्रम म्हणून व इतरांचा जीव वाचविण्यासाठी रक्तदान हे श्रेष्ठदान ठरविण्यासाठी रक्तदान शिबिर घेतले जात आहे.

रोडग्याची यात्रा, तमाशावर बंदी

बहिरम यात्रेत शनिवारी दाखल झालेले आमदार बच्चू कडू यांनी काही वर्षांपूर्वी तमाशावर बंदी घातली. त्याला काही प्रमाणात प्रचंड विरोध झाला. मात्र, त्या मोबदल्यात त्यांनी विविध उपक्रम राबविले. वांग्याची भाजी, रोडगे आणि परंपरागत हंडीचे जेवण खवय्यांना आनंद देऊन जातो.

टॅग्स :SocialसामाजिकBull Cart Raceबैलगाडी शर्यतAmravatiअमरावती