शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

देशात पहिल्यांदा तिरंग्याला सलामीने सुरू झाला शंकरपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 13:03 IST

इंग्रजांविरुद्ध रणनीती, स्वातंत्र्यानंतर कापूस उत्पादकांचे आंदोलनही

बहिरम/परतवाडा : विदर्भातील सर्वांत प्रसिद्ध असलेल्या व सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम यात्रेत शनिवारपासून मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. देशात पहिल्यांदा तिरंग्याला सलामी देत शेतकऱ्यांचा हा उत्सव सुरू झाला.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवरील बहिरम यात्रा मागील एक महिन्यापासून लाखो भक्तांच्या दर्शन व भेटीने फुलली आहे. शनिवार, रविवार दोन दिवस लाखांवर असलेली गर्दी, त्यासाठी प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त आणि आवश्यकतेनुसार वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शनिवारपासून प्रहार संघटनेतर्फे लाखो रुपयांचे बक्षीस असलेली शंकरपट स्पर्धा सुरू झाली आहे. ध्वजपूजन परतवाडा येथील डॉ. प्रभू जवंजाळ यांनी केले.

स्वातंत्र्यपूर्व इतिहासात इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य आंदोलनाचे बीज बहिरम येथूनच पेरले गेले. स्वातंत्र्यानंतर १९७५ मध्ये एकाधिकारात कापसाच्या राज्यबंदीची बंधने तोडण्यासाठी आंदोलन बहिरम येथे झाले. त्याकाळी कापूस आंदोलनात गोळीबार करण्यात आला होता. त्यात कापूस उत्पादक तथा शेतकरी नेते विठ्ठलराव दुतोंडे शहीद झाले. बहिरमच्या परिसरातच देशाच्या महत्त्वाच्या क्रांतिकारकांच्या गोपनीय बैठका होत होत्या. स्वातंत्र्यलढ्याचे गनिमी कावे येथेच आखले जात होते. वऱ्हाडातील रणनीती याच मातीत पूर्णत्वास जात होती. या सर्व क्रांतिकारकांचा वावर मोठ्या प्रमाणात बहिरम परिसरात होता. त्यांच्या रक्ताने येथील भूमी पावन झाली आहे. संत गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने येथील नवसासाठी बोकडबळी प्रथा बंद झाली.

शहिदांना नमन, बहिरम एक आदर्श यात्रा

शहिदांना नमन म्हणून अचलपूर मतदारसंघाचे आ. बच्चू कडू यांनी शहीद बहिरम पुढील पिढीसाठी एक आदर्श व्हावे म्हणून बहिरम एक आदर्श यात्रा नावारूपास आणली. याकरिता गेले दहा वर्षे अनेक शासकीय, निमशासकीय कार्यक्रम बहिरम यात्रेत सुरू करण्यात आले.

शेती साहित्य, पेरणीचे नियोजन, बी-बियाणे

शेतातील पिके बाहेर निघाली, धान्याची विक्री झाली की, बहिरमची यात्रा सुरू होते. त्याचदरम्यान पुढच्या वर्षीच्या पिकाचे नियोजन, बी-बियाणे यावरसुद्धा या यात्रेत पूर्वी चर्चा व्हायची. शेती साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीला यायचे. ही परंपरा आजसुद्धा कायम आहे.

रक्तपात नव्हे, रक्तदान आदर्श संदेश

यात्रेदरम्यान प्रहार संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर सुरू आहे. शंकरपटात कुठल्याच प्रकारचा रक्तपात न होता एक आदर्श उपक्रम म्हणून व इतरांचा जीव वाचविण्यासाठी रक्तदान हे श्रेष्ठदान ठरविण्यासाठी रक्तदान शिबिर घेतले जात आहे.

रोडग्याची यात्रा, तमाशावर बंदी

बहिरम यात्रेत शनिवारी दाखल झालेले आमदार बच्चू कडू यांनी काही वर्षांपूर्वी तमाशावर बंदी घातली. त्याला काही प्रमाणात प्रचंड विरोध झाला. मात्र, त्या मोबदल्यात त्यांनी विविध उपक्रम राबविले. वांग्याची भाजी, रोडगे आणि परंपरागत हंडीचे जेवण खवय्यांना आनंद देऊन जातो.

टॅग्स :SocialसामाजिकBull Cart Raceबैलगाडी शर्यतAmravatiअमरावती