शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भरावाचा मुख्य कालवा धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 01:06 IST

घुशीने पोखरल्यामुळे पुण्याच्या मुठा नदीवरील भरावाचा कालवा फुटला अन् हजारो संसार उघड्यावर आल्याची घटना २७ सप्टेंबर २०१८ ला घडली होती. अशीच परिस्थिती ऊर्र्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याबाबत झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला प्रतीक्षा मुठेच्या पुनरावृत्तीची ! : उर्ध्व वर्धाच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घुशीने पोखरल्यामुळे पुण्याच्या मुठा नदीवरील भरावाचा कालवा फुटला अन् हजारो संसार उघड्यावर आल्याची घटना २७ सप्टेंबर २०१८ ला घडली होती. अशीच परिस्थिती ऊर्र्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याबाबत झाली आहे. तिवसानजीक मुख्य कालव्याच्या ४० किमी अंतरात सरळ विमोचकाचे गेट खराब झाले आहे. याच ठिकाणी तळेगाव ठाकूर येथे जाणारा विमोचक गाळाने ओव्हरटॅप होत असल्याने, येथीलच कालव्यावरील गेट खराब झाल्याने व मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणातून पाझर फुटल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे भरावाचा कालवाच धोक्यात आला आहे.यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके धोक्यात आली. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने कपाशी, तूर व हरभऱ्याच्या पेरणीसाठी फक्त दोन पाळ्यांमध्ये सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. सध्या १८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात पाण्याची पहिली पाळी सोडण्यात आली. त्यामुळे किमी ४० मधील सरळ विमोचकाची स्थिती उघडकीस आली. या ठिकाणचा स्टेमरॉड खराब झाल्याने गेटदेखील बंद होत नाही. परिणामी कालव्याचे पाणी लगतच्या परिसरात वाहत आहे. दररोज लाखो लिटर पाण्याने परिसरातील तीन ठिकाणी तलाव तयार झाला आहे. हीच स्थिती तळेगाव ठाकूर विमोचकाची आहे. मायनर गाळाने बुजल्याने पाणी ओव्हरटॅप होऊन बाजूला पसरले. विशेष म्हणजे, कालव्याच्या अस्तरीकरणाच्या जॉइंटमध्ये झुडुपे उगवली आहेत व याच भेगांमधूनही पाणी पाझरत असल्याने मुख्य कालवाच धोक्यात आला आहे. कोट्यवधी लिटर पाणी या ठिकाणी साचले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास परिसरातील पिके खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.अस्तरीकरणाच्या भेगांमधून पाझरभराव्याच्या कालव्याला अस्तरीकरण केले असले तरी भेगांमधून व भगदाडांमधून पाणी जर पाझरत असेल, तर ग्रेडेशनवर परिणाम होतो. कालव्याच्या तळाच्या उतारावर गाळ साचतो व या ठिकाणी गवत व झाडे उगवतात व यामुळे भरावाला धोका निर्माण होतो, अशी माहिती सिंचन क्षेत्रातील एका अभियंत्याने दिली. उजव्या मुख्य कालव्यावर अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याने व हा कालवादेखील भरावाचाच असल्याने भविष्यात धोका असल्याचे सत्य नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.पाण्यात कपात; अपव्ययात लाखो लिटरऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यस्थितीत ४१ टक्केच पाणीसाठा आहे. यामध्ये किमान पाच टक्के जरी मृत साठा गृहीत धरला तरी ३६ टक्केच साठा आहे. सिंचनाच्या पाण्यासाठी एका पाळीत सात टक्के पाणीसाठा कमी होतो. आता आणखी एक पाळी तीन आठवड्यांनी देण्यात येणार आहे. म्हणजेच २९ टक्केच साठा प्रकल्पात शिल्लक राहील. त्यामध्येही, बाष्पीभवन, औद्योगिक व शहरी वापरासाठी पाणी वापरले जाणार आहे. पाणी कपातीसाठी अमरावती शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे अन् सिंचन विभागाच्या बेपर्वाईने रोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

टॅग्स :Waterपाणी