शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

भरावाचा मुख्य कालवा धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 01:06 IST

घुशीने पोखरल्यामुळे पुण्याच्या मुठा नदीवरील भरावाचा कालवा फुटला अन् हजारो संसार उघड्यावर आल्याची घटना २७ सप्टेंबर २०१८ ला घडली होती. अशीच परिस्थिती ऊर्र्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याबाबत झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला प्रतीक्षा मुठेच्या पुनरावृत्तीची ! : उर्ध्व वर्धाच्या लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घुशीने पोखरल्यामुळे पुण्याच्या मुठा नदीवरील भरावाचा कालवा फुटला अन् हजारो संसार उघड्यावर आल्याची घटना २७ सप्टेंबर २०१८ ला घडली होती. अशीच परिस्थिती ऊर्र्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याबाबत झाली आहे. तिवसानजीक मुख्य कालव्याच्या ४० किमी अंतरात सरळ विमोचकाचे गेट खराब झाले आहे. याच ठिकाणी तळेगाव ठाकूर येथे जाणारा विमोचक गाळाने ओव्हरटॅप होत असल्याने, येथीलच कालव्यावरील गेट खराब झाल्याने व मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणातून पाझर फुटल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे भरावाचा कालवाच धोक्यात आला आहे.यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके धोक्यात आली. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने कपाशी, तूर व हरभऱ्याच्या पेरणीसाठी फक्त दोन पाळ्यांमध्ये सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. सध्या १८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात पाण्याची पहिली पाळी सोडण्यात आली. त्यामुळे किमी ४० मधील सरळ विमोचकाची स्थिती उघडकीस आली. या ठिकाणचा स्टेमरॉड खराब झाल्याने गेटदेखील बंद होत नाही. परिणामी कालव्याचे पाणी लगतच्या परिसरात वाहत आहे. दररोज लाखो लिटर पाण्याने परिसरातील तीन ठिकाणी तलाव तयार झाला आहे. हीच स्थिती तळेगाव ठाकूर विमोचकाची आहे. मायनर गाळाने बुजल्याने पाणी ओव्हरटॅप होऊन बाजूला पसरले. विशेष म्हणजे, कालव्याच्या अस्तरीकरणाच्या जॉइंटमध्ये झुडुपे उगवली आहेत व याच भेगांमधूनही पाणी पाझरत असल्याने मुख्य कालवाच धोक्यात आला आहे. कोट्यवधी लिटर पाणी या ठिकाणी साचले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास परिसरातील पिके खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.अस्तरीकरणाच्या भेगांमधून पाझरभराव्याच्या कालव्याला अस्तरीकरण केले असले तरी भेगांमधून व भगदाडांमधून पाणी जर पाझरत असेल, तर ग्रेडेशनवर परिणाम होतो. कालव्याच्या तळाच्या उतारावर गाळ साचतो व या ठिकाणी गवत व झाडे उगवतात व यामुळे भरावाला धोका निर्माण होतो, अशी माहिती सिंचन क्षेत्रातील एका अभियंत्याने दिली. उजव्या मुख्य कालव्यावर अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याने व हा कालवादेखील भरावाचाच असल्याने भविष्यात धोका असल्याचे सत्य नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.पाण्यात कपात; अपव्ययात लाखो लिटरऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यस्थितीत ४१ टक्केच पाणीसाठा आहे. यामध्ये किमान पाच टक्के जरी मृत साठा गृहीत धरला तरी ३६ टक्केच साठा आहे. सिंचनाच्या पाण्यासाठी एका पाळीत सात टक्के पाणीसाठा कमी होतो. आता आणखी एक पाळी तीन आठवड्यांनी देण्यात येणार आहे. म्हणजेच २९ टक्केच साठा प्रकल्पात शिल्लक राहील. त्यामध्येही, बाष्पीभवन, औद्योगिक व शहरी वापरासाठी पाणी वापरले जाणार आहे. पाणी कपातीसाठी अमरावती शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे अन् सिंचन विभागाच्या बेपर्वाईने रोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

टॅग्स :Waterपाणी