अखेर सातव्या दिवशी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास तूर्तास स्थगिती, २ ऑक्टोबरपर्यंत सरकारला अल्टीमेटम
By गणेश वासनिक | Updated: June 14, 2025 16:48 IST2025-06-14T16:47:14+5:302025-06-14T16:48:01+5:30
Amravati : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य सरकारच्या आश्वासनाचे पत्र देत मध्यस्थी करून उपोषण साेडविले

Finally, on the seventh day, Bachchu Kadu's hunger strike is suspended for the time being, ultimatum to the government by October 2
अमरावती: शेतकरी कर्जमाफी यासह अन्य १७ मागण्याच्या पूर्ततेसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदाेलन सुरू केले होते शनिवार १४ जून हा आंदाेलनाचा सातवा दिवस असताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्यावतीने बच्चू कडू यांच्या नावे पत्र जारी केले.
यात १५ दिवसात शेतकरी कर्जमाफीसाठी उच्च स्तरीय समिती नेमली जाणार असून समितीचा अहवाल प्राप्त होताच कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या सलीला स्थगिती देणे आणि नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. तर दिव्यांगाच्या मानधन वाढीसाठी ३० जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील. दरम्यान राज्य सरकारकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंदाेलनस्थळी भेट देत सरकारचे पत्र देत बच्चू कडू यांचे उपोषण साेडविले.