शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

वणी बेलखेड येथे भीषण आग; तीन घरे, दोन गोठे, ट्रॅक्टर, गाई खाक, लाखोंचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 19:52 IST

या घटनेमुळे या तीनही शेतमजुरांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे.

अमरावती: बेलोरा तालुक्यातील वणी (बेलखेड) येथे शनिवारी सकाळी भीषण आग लागली. यात तीन घरे, दोन जनावरांचे गोठे, दोन गाई व एक ट्रॅक्टर जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत सात ते आठ लाखांचे नुकसान झाले असून, तीन कुटुंब उघडल्यावर आली आहेत.

वणी बेलखेडा येथे शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल दोन तास चाललेल्या या अग्नितांडवाने काही क्षणातच उग्ररूप धारण केले. या आगीत अरुण मानकर, मंगला काळे, अब्दुल सत्तार या शेतमजुरांची घरे भक्ष्यस्थानी सापडली. यात घरातील धान्यांसह सर्व संसारोपोयोगी साहित्यांची राख झाली आहे. योगेश अलोणे व गजानन फुले या शेतकऱ्यांचे गोठे जळून खाक झाले आहेत.

या आगीत शेतकरी योगेश अलोणे यांच्या दोन गाई भाजल्या, तर गजानन फुले यांची ट्रॅक्टरसह सर्व शेती अवजारे जळाली आहेत. या घटनेमुळे या तीनही शेतमजुरांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. या शेतमजुरांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार नुकसानीचा आकडा ७ ते ८ लाखांच्या घरात असला तरी प्रत्यक्ष पाहणी अहवालानंतर या वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सामूहिक प्रयत्नही पडले थिटे -आग लागल्याचे लक्षात येताच वणी ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सर्वांनी सामूहिकरीत्या आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. परंतु आगीचे रौद्ररूप पाहता प्रसंगावधान राखून प्रहारचे मंगेश देशमुख यांनी तातडीने चांदूरबाजार येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर आग आटोक्यात आली. महसूलच्या मंडल अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली.

आगीची माहिती मिळताच, महसूलच्या प्रतिनिधींनी घटनास्थळ गाठले. तीन कुटुंबांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. रविवार, २६ डिसेंबरला नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असे चांदूरबाजारचे तहसीलदार धीरज स्थुल यांनी सांगितले. 

टॅग्स :fireआगAmravatiअमरावतीFarmerशेतकरीcowगायHomeसुंदर गृहनियोजन