शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पेढी धरणावर गळफास घेऊन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

अमरावती : पेढी धरणाच्या भिंतीवर गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. वामन महादेव मानकर ...

अमरावती : पेढी धरणाच्या भिंतीवर गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. वामन महादेव मानकर (७०, रा. वासेवाडी. ता. भातकुली) असे मृताचे नाव आहे.

वामन मानकर यांनी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. धरणात ८ एकर शेतजमीन गेल्यानंतर सरकारकडून अल्प मोबदला मिळाल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. सोमवारी दुपारी काही गावकऱ्यांना त्यांचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या पेढी धरणाच्या भिंतीवर लटकलेल्या अवस्थेत आढळला. वामन मानकर हे भातकुली येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत पैसे काढण्यास गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धट वागणूक दिली व त्रास दिला. ८ एकर शेतीच्या मिळालेल्या अत्यल्प मोबदल्यात कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच रवि राणा यांनी तत्काळ वासेवाडी गावात कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेस जबाबदार असलेल्या बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

साततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी त्रस्त असून, मुख्यमंत्र्यांनी आतातरी जागे व्हावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार रवि राणा यांनी केली. धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही आ. राणा म्हणाले.

चौकट

वासेवाडी येथील वामन मानकर यांनी बँकेच्या जाचाला कंटाळून पेढी बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केली. धरणात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने व सततच्या नापिकीला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपवली. आत्महत्याग्रस्त मानकर कुटुंबाला तात्काळ १० लाख रुपये मदत द्यावी.

- रवि राणा, आमदार, बडनेरा

--------------------