शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

शेतकऱ्याने बाजार समितीपुढेच विकली कोबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

गत २२ दिवसांपासून गायब झालेला पाऊस हल्ली कोसळत असल्याने सोयाबीन, ज्वारी, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे. ...

गत २२ दिवसांपासून गायब झालेला पाऊस हल्ली कोसळत असल्याने सोयाबीन, ज्वारी, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र, अधिक पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. नजीकच्या लोणी येथील अशोक वानखडे नामक युवा शेतकरी हे शनिवारी सकाळी येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत चारचाकी वाहनाने कोबी विक्रीसाठी घेऊन आले. मात्र, बाजार समितीत येण्यास विलंब झाला. त्यामुळे कोबी भरून आणलेल्या वाहनाला बाजार समितीत प्रवेश मिळाला नाही. वाहनात आणलेली कोबी परत घेऊन जाणे वाहन भाड्याला परवडणारे नव्हते. अखेर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच या शेतकऱ्याने कोबी पाच रुपये नगाने विकून किमान वाहतूक भाडे तरी निघावे, यासाठी शक्कल लढविली. मात्र, मातीमाेल भावाने कोबी विकूनही वाहतूक खर्च निघाला नाही, अशी कैफीयत शेतकरी वानखडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. एरवी २५ ते ३० रुपये किलो दराने विकणारी कोबी पाच रुपयांमध्ये मिळत असल्याने ग्राहकांच्यादेखील खरेदीसाठी उड्या पडल्या.