शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

जानेवारीपश्चात वैरण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:28 IST

जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळस्थिती शासनाने जाहीर केली असली तरी सर्वच तालुक्यांत हीच स्थिती कायम आहे. जिल्ह्यातील ८ लाख पशुधनाला किमान जानेवारीपर्यंत पुरेल एवढ्या वैरणीची तजवीज तूर्तास आहे. त्यानंतर मात्र वैरण टंचाईची झळ पोहोचणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : आठ लाख पशुधन, चाराटंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळस्थिती शासनाने जाहीर केली असली तरी सर्वच तालुक्यांत हीच स्थिती कायम आहे. जिल्ह्यातील ८ लाख पशुधनाला किमान जानेवारीपर्यंत पुरेल एवढ्या वैरणीची तजवीज तूर्तास आहे. त्यानंतर मात्र वैरण टंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग पुढे सरसावला आहे. वैरणटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी आता कालबद्ध कार्यक्रमाद्वारे नियोजन सुरू आहे.१९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात सहा लाख ५० हजार २२८ पशुधन आहेत. याव्यतिरिक्त शेळ्या ७२,०५४ व मेंढ्या २,८१,२९० आहेत. या सर्व गुरांना जानेवारीपर्यंत पुरेल एवढ्या वैरणाची जिल्ह्यात तजवीज आहे. सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे कुटाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता अपुऱ्या पावासामुळे जमिनीत आर्द्रता नसल्याने रबी हंगामदेखील धोक्यात आलेला आहे. सोयाबीन, गहू व तुरीच्या कुटाराची साठवण हीच जिल्ह्यातील जिरायती शेतकºयांची उन्हाळ्यासाठी बेगमी असते. मात्र, यंदा विपरीत स्थिती असल्याने वैरणाची साठवण होऊ शकली नाही. जिल्ह्यात हायब्रिड किंवा गावरान ज्वार आता कालबाह्य ठरत असल्याने कटबा किंवा कुट्टीदेखील नाही. यामुळे वैरणटंचाईचा दाह यंदा चांगलाच जाणवणार आहे.शासनाने दुष्काळसदृश तालुके जाहीर केल्याने त्या तालुक्यांत चाराटंचाई उद्भवणार आहे. यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या पशुपालकांसाठी वैरण बियाणे व खतांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रति १० गुंठ्यांकरिता ४६० रूपयांपर्यंत, तर एक हेक्टरकरिता अधिकतम ४,६०० रूपये १०० टक्के अनुदानाची मर्यादा आहे. यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. या योजनेमध्ये मका पाच किलो व ज्वारी चार किलो बियाणे देण्यात येणार आहे. यामध्ये मक्याचे किमान ५००० व ज्वारीचे ४५०० किलो हिरव्या वैरणाचे उत्पादन अपेक्षित असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.तालुका समितीचे मॉनिटरिंगसद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचा परिणामकारकरित्या चारा उत्पादनाकरिता उपयोग होण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांची निवड व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेत समिती योजनेचे मॉनिटरींग होणार आहे. यामध्ये तालुक्यांचे पशुधन विकास अधिकारी सचिव, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी सदस्य आहेत.अशी होणार लाभार्थ्यांची निवडपशुपालकाकडे चारा लागवडीकरिता पुरेसे क्षेत्र उपलब्ध होण्याची खात्री करण्यासाठी जमिनीचा सात-बारा, अर्जासोबत घेण्यात येणार आहे. तसेच पशुपालकाकडे विहीर, बोअरवेल, शेततळे, कालवा अदींची सिंचन सुविधा असल्याची खात्री करण्यात येणार आहे. बियाण्यांची किंमत वगळता उर्वरित रक्कम पशुपालकांच्या बँक खात्यात १० दिवसांत डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.वैरण टंचाई निवारणासाठी ७० टन मका व बाजरा बियाण्यांचे सध्या वाटप सुरू आहे. गावपातळीवर सर्वेक्षण व लाभार्थ्यांना अर्ज वाटप करण्यात येत आहे. वर्षभर हिेरवा चारा उपलब्ध होण्यासाठी १८ लाख ठोंब्याचे वाटप करण्यात आले असून सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहे.- डॉ. विजय राहाटे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी