शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

विक्रीनंतरही संत्रा उत्पादकांना अतिरिक्त नफा; संत्र्यापासून ज्यूस निर्मिती, बॉटलिंग प्लांट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 3:14 PM

व्यापाऱ्यांशी सौदा झाल्यावर त्यांना केवळ चांगल्या दर्जाची फळांची विक्री व उर्वरित फळांवर प्रक्रिया करीत त्याचा ज्यूस बाजारात विक्री करून अतिरिक्त नफा कमविण्याची किमया अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादकांनी साधली आहे. 

- वीरेंद्रकुमार जोगी अमरावती : व्यापाऱ्यांशी सौदा झाल्यावर त्यांना केवळ चांगल्या दर्जाची फळांची विक्री व उर्वरित फळांवर प्रक्रिया करीत त्याचा ज्यूस बाजारात विक्री करून अतिरिक्त नफा कमविण्याची किमया अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादकांनी साधली आहे. संत्राबागांची खरेदी होत असताना केवळ पहिल्या व दुसऱ्या दर्जाचीच फळे व्यापारी नेतील, उर्वरित फळांवर प्रक्रिया करण्याचा निश्चय शिरजगाव कसबा येथील शेतकऱ्यांनी केला. यातूनच विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया अ‍ॅण्ड उद्योग प्रोड्युसर कंपनी उभी राहिली. शेतकरी मनोहर सुने, अशोक यावल, श्रीपाद आसरकर, सचिन यावले, प्रमोद कुऱ्हाळे, उषा रतीलाल सातपुते, विलास दामोदर, पवन निमकर, नीलेश राजस यांनी यासाठी पुढाकार घेतला. 

कंपनीमध्ये सुमारे पाचशेहून अधिक शेअरधारकांचा समावेश आहे. भागभांडवल व अनुदानातून प्रक्रिया उद्योग उभा राहिला. कंपनीचा स्वत:च्या मालकीचा बॉटलिंग प्लांट असून ‘ऑरेंज एनर्जी’ हे ज्यूस ब्रँड बाजारात उपलब्ध झाले. पूर्वी शेतकऱ्यांच्या बागांतील संत्र्यांची छाटनी केल्यावर ती फेकून दिली जात होती किंवा स्थानिक व्यापाºयांना त्याची विक्री केली जात होती. 

वेअरहाऊस उभारलेभागभांडवलधारक व ३० शेतकरीगट असे कंपनीचे हजाराहून अधिक सदस्य आहेत. कंपनीने शिरजगाव कसबा येथे वेअरहाऊस आहे. संत्रा व अन्य शेतमालाची साठवणूक येथे केली जाते. कंपनीचे अत्याधुनिक ज्यूस प्रक्रिया संयत्र असून याच ठिकाणी शेतमालसंबंधित अन्य उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कंपनीकडे सहा हजार स्केवअरफुटमध्ये ज्यूस सयत्र आहेत. 

शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम शेतमालास हमीभाव, बाजारपेठ मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगारांची संधी निर्माण करून देणे, शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, बी-बियाणे वाजवी दरात उपलब्ध करून देणे, वेअर हाऊसचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे यासह अनेक उपक्रम कंपनीच्या माध्यामतून राबविले जात आहेत.

शेतकऱ्यांना फायदा व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे. यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होईल. ज्यूस विक्रीतून शेतकऱ्यांना ५० टक्केपेक्षा अतिरिक्त नफा होणार आहे. वर्षभर संत्रा प्रक्रिया सुरू रहावी, असा आमचा प्रयत्न आहे.- मनोहर सुने, अध्यक्ष, विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया अ‍ॅण्ड उद्योग प्रोड्युसर कंपनी, शिरजगाव कसबा

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी