शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

विक्रीनंतरही संत्रा उत्पादकांना अतिरिक्त नफा; संत्र्यापासून ज्यूस निर्मिती, बॉटलिंग प्लांट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 15:15 IST

व्यापाऱ्यांशी सौदा झाल्यावर त्यांना केवळ चांगल्या दर्जाची फळांची विक्री व उर्वरित फळांवर प्रक्रिया करीत त्याचा ज्यूस बाजारात विक्री करून अतिरिक्त नफा कमविण्याची किमया अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादकांनी साधली आहे. 

- वीरेंद्रकुमार जोगी अमरावती : व्यापाऱ्यांशी सौदा झाल्यावर त्यांना केवळ चांगल्या दर्जाची फळांची विक्री व उर्वरित फळांवर प्रक्रिया करीत त्याचा ज्यूस बाजारात विक्री करून अतिरिक्त नफा कमविण्याची किमया अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादकांनी साधली आहे. संत्राबागांची खरेदी होत असताना केवळ पहिल्या व दुसऱ्या दर्जाचीच फळे व्यापारी नेतील, उर्वरित फळांवर प्रक्रिया करण्याचा निश्चय शिरजगाव कसबा येथील शेतकऱ्यांनी केला. यातूनच विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया अ‍ॅण्ड उद्योग प्रोड्युसर कंपनी उभी राहिली. शेतकरी मनोहर सुने, अशोक यावल, श्रीपाद आसरकर, सचिन यावले, प्रमोद कुऱ्हाळे, उषा रतीलाल सातपुते, विलास दामोदर, पवन निमकर, नीलेश राजस यांनी यासाठी पुढाकार घेतला. 

कंपनीमध्ये सुमारे पाचशेहून अधिक शेअरधारकांचा समावेश आहे. भागभांडवल व अनुदानातून प्रक्रिया उद्योग उभा राहिला. कंपनीचा स्वत:च्या मालकीचा बॉटलिंग प्लांट असून ‘ऑरेंज एनर्जी’ हे ज्यूस ब्रँड बाजारात उपलब्ध झाले. पूर्वी शेतकऱ्यांच्या बागांतील संत्र्यांची छाटनी केल्यावर ती फेकून दिली जात होती किंवा स्थानिक व्यापाºयांना त्याची विक्री केली जात होती. 

वेअरहाऊस उभारलेभागभांडवलधारक व ३० शेतकरीगट असे कंपनीचे हजाराहून अधिक सदस्य आहेत. कंपनीने शिरजगाव कसबा येथे वेअरहाऊस आहे. संत्रा व अन्य शेतमालाची साठवणूक येथे केली जाते. कंपनीचे अत्याधुनिक ज्यूस प्रक्रिया संयत्र असून याच ठिकाणी शेतमालसंबंधित अन्य उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कंपनीकडे सहा हजार स्केवअरफुटमध्ये ज्यूस सयत्र आहेत. 

शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम शेतमालास हमीभाव, बाजारपेठ मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगारांची संधी निर्माण करून देणे, शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, बी-बियाणे वाजवी दरात उपलब्ध करून देणे, वेअर हाऊसचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे यासह अनेक उपक्रम कंपनीच्या माध्यामतून राबविले जात आहेत.

शेतकऱ्यांना फायदा व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे. यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होईल. ज्यूस विक्रीतून शेतकऱ्यांना ५० टक्केपेक्षा अतिरिक्त नफा होणार आहे. वर्षभर संत्रा प्रक्रिया सुरू रहावी, असा आमचा प्रयत्न आहे.- मनोहर सुने, अध्यक्ष, विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया अ‍ॅण्ड उद्योग प्रोड्युसर कंपनी, शिरजगाव कसबा

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी