शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

वनजमिनीवरील अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही

By admin | Updated: May 30, 2014 23:19 IST

जंगल व वनांचे संरक्षण करण्यासाठी शासन स्तरावरून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र काहींच्या आश्रयाने वनजमिनीवर अतिक्रमण होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे सन २00५ नंतर

मुलाखत : मुख्य वनसंरक्षकांची स्पष्टोक्तीगणेश वासनिक - अमरावतीजंगल व वनांचे संरक्षण करण्यासाठी शासन स्तरावरून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र काहींच्या आश्रयाने वनजमिनीवर अतिक्रमण होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे सन २00५ नंतर झालेले वनजमिनीवरील अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. या अतिक्रमणप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांनी गुन्हे दाखल करून घेतले नाही तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्टोक्ती  मुख्यवनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी लोकमतशी बोलताना दिली.तिवारी यांनी अमरावती मुख्य वनसंरक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वनविभागात प्रशासकीय स्तरावर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून कर्मचार्‍यांच्या कार्यप्रणालीला अधिक गतिमान केले. नुकत्याच वनरक्षक, वनपालांच्या बदली प्रक्रियेत वनपरिक्षेत्र अधिकारी किं वा उपवनसंरक्षक यांच्याकडून यादी न मागविता कर्मचार्‍यांना न्याय मिळावा त्याकरिता प्रक्रिया राबविली. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठिय्या मांडून बसलेल्या वनपाल व वनरक्षकांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बदली करण्यात आली. समान न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे  वनकर्मचार्‍यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. आरामशीममध्ये येणार्‍या अवैध लाकडावरही अंकुश लावण्यासाठी टॉक्स फोर्स त्यांनी गठित केले. परिणामी अवैध वृक्षतोडीवर काहीअंशी लगाम लागल्याचे तिवारी यांनी सांगितले. वनविभागात अनुकंपा तत्त्वावर वनरक्षकांची पदे १0 टक्के भरली जाणार आहे. सन २0१२ पासून लागू झालेल्या या नियमावलीत वर्ग ३ ची १२ तर वर्ग ४ ची ४ पदे भरली जाणार आहेत. शिपाई व लिपिक पदाच्या रिक्त जागांसाठी लवकरच जाहिरात प्रकाशित केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. वनविभागात कार्यरत पदवीधर सुरक्षारक्षक आहेत. त्यांनी सेवेची पाच वर्षे पूर्ण केल्यास त्यांना २५ टक्के पदोन्नतीचे धोरण शासनाच्या आहे.