शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

आठ विद्यार्थी रोमानिया हंगेरीमध्ये सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:01 IST

युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले होते. तेथे युद्धस्थिती होताच दोघे भारतात परतले. यानंतर बुधवारी रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून विमानाने स्वराज पुंड हा विद्यार्थी दुपारी दिल्लीत परतला आहे. त्याला गुरुवारी नागपूरला विमानाने पाठविण्यात येणार आहे. आम्ही त्याला आणायला जात असल्याचे त्याची आई अर्चना पुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युक्रेनमधून आठ विद्यार्थी सीमापार हंगेरी व रोमानियामध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी ते सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय एक विद्यार्थी बुधवारी दुपारी दिल्लीला पोहोचला व गुरुवारी नागपूरला व नंतर अमरावतीला येणार असल्याची माहिती त्याच्या परिवाराने दिली. उर्वरित विद्यार्थ्यांच्या मायदेशी परतण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले होते. तेथे युद्धस्थिती होताच दोघे भारतात परतले. यानंतर बुधवारी रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून विमानाने स्वराज पुंड हा विद्यार्थी दुपारी दिल्लीत परतला आहे. त्याला गुरुवारी नागपूरला विमानाने पाठविण्यात येणार आहे. आम्ही त्याला आणायला जात असल्याचे त्याची आई अर्चना पुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान प्रणव फुसे, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ गजभिये, प्रणव भारसाकळे, मोहम्मद नोमान महम्मद रिझवान,  कुणाल कावरे व नेहा लांडगे यांनी युक्रेनची सीमा पार करून लगतच्या रोमानिया व हंगेरी या देशात पोहोचले असल्याचे नियंत्रण कक्षाने सांगितले. काही विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी पुष्टी केली. आम्ही सुरक्षित आहोत, दूतावासाचे व येथील नागरिक, एनजीओंचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.ईस्टमधून वेस्ट युक्रेनचा १५०० किमीचा प्रवासईस्ट युक्रेनमधून वेस्ट युक्रेनमध्ये जाण्यासाठी १५०० किमी व ३३ तासांचा प्रवास करावा लागला. त्यानंतर बुधवारी आम्ही हंगेरीत पोहोचलो आहे. या प्रवासात केवळ शेवटच्या स्टेशनवर ब्रेडची व्यवस्था झाली. बुडापेस्ट या शहरात दूतावासातर्फे आमची एका हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच आम्ही मायदेशी पोहोचू, असे प्रणव भारसाकळे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांचा स्वराजशी संवादयुक्रेनमधून रोमानिया व तेथून भारतात परतलेल्या स्वराज पुंड याच्यासोबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला व त्याच्या प्रवासासह तेथील परिस्थिती जाणून घेतली. यासोबतच भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी (दिघडे) यांनीदेखील त्याची चौकशी करून भारतात परतल्याबाबत त्याचे स्वागत केल्याचे सांगण्यात आले.

 

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी