शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जलपर्णीमुळे नद्यांचा श्वास गुदमरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:34 IST

कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील नद्या फारशा प्रवाहीत नाहीत. त्यामध्ये गावागावांतील सांडपाणी सोडण्यात येते. पात्रातही मोठ्या प्रमाणावर चिला, जलपर्णी व शेवाळाचा थर साचल्याने प्रवाह दिसेनासा झाला आहे. पात्रात बेशरम वाढल्याने पाणी विषाक्त झाले आहे. त्यामुळे मानवासह जनावरांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबेशरममुळे पाणी विषाक्त : स्वच्छता अभियान अन् जलयुक्त शिवारची कामे केव्हा? नागरिकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील नद्या फारशा प्रवाहीत नाहीत. त्यामध्ये गावागावांतील सांडपाणी सोडण्यात येते. पात्रातही मोठ्या प्रमाणावर चिला, जलपर्णी व शेवाळाचा थर साचल्याने प्रवाह दिसेनासा झाला आहे. पात्रात बेशरम वाढल्याने पाणी विषाक्त झाले आहे. त्यामुळे मानवासह जनावरांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.केंद्र शासनाने स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा केला. मात्र, गावागावांतील लहान-मोठ्या नद्या व नाल्यांची स्वच्छता कधी झालीच नाही. जलयक्त शिवारमध्ये ही कामे करण्याचे जिल्हा प्रसासनाला कधीही सुचलेच नाही. त्यामुळे नदीपात्रांना बकाल स्वरूप आले असून नद्या आता गटारगंगा बनल्याचे दुर्देवी चित्र बहुतेक गावांत पाहायला मिळते.यंदाच्या पावसाळ्यात नद्यांना पूर गेलाच नाही. त्यामुळे पात्रात मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे. बहुतांश गावांत नदी-नाल्यांवर बंधारे बांधल्याने वाहत्या नद्यांचा प्रवाह खोळंबला. यामध्ये गावातील सांडपाण्याने भर घातली. लहान-मोठ्या कारखान्याचे प्रदूषित पाणी नदी-नाल्यांत सोडण्यात येत असल्याने शुद्ध पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या नद्यांना गटारीचे स्वरुपा आले आहे. नदी-नाल्यांचा प्रवाह खोळंबल्याने पाण्यात घाण वाढली. यामध्ये जलपर्णीची भर पडली व संपूर्ण नदीपात्रच घाणीच्या विळख्यात सापडले आहे. आरोग्यास हाणीकारक असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून नद्यांची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे.शहरात अंबानाल्यासह सातुर्नाचा नाला हा दलदलीने बुजला आहे. या नाल्यात चमकुºयाची झाडे व जलपर्णी असल्यामुळे अनेकदा ही दलदल लक्षातही येत नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत असल्याने लगतच्या वस्त्यांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेद्वारा नाल्यांची सफाई होत नसल्यामुळे नाले आता नागरिकांच्या जीवावर उठले आहेत.सांडपाण्यावर भाजीपालाशहरातील सांडपाणी ज्या नाल्यांमध्ये सोडले जाते, त्याच सांडपाण्यावर शहरालगतच्या शेतांमध्ये भाजीपाला पिकविला जातो व हाच भाजीपाला शहरात विकला जातो. अत्यंत घातक रसायने यात असल्यामुळे मानवी आरोग्यासाठी हा अत्यंत घातक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारा यावर अद्याप कोणतीही कारवार्ई करण्यात आलेली नाही, हे विशेष.दूषित पाण्यामुळे त्वचेचे रोगनदी-नाल्यांचे प्रदूषित पाणी वापरास अत्यंत घातक आहे. या घाण पाण्याचा त्वचेशी संपर्क आल्यास त्वचेवर खाज आदी होत असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात या दूषित व घाण पाण्यात कपडे धुतले जातात. त्यामुळे त्वचेचे विकार होत आहेत. तसेच हे पाणी जनावर पीत असल्याने त्यांनादेखील तोंडखुरी आदी आजार होत आहेत.नदीपात्रात टाकला जातो कचराशहरातील नाले असो की गावातील नद्या यामध्ये सांडपाणी व कारखाण्याचे प्रदुषीत पाणी सोडल्या जाते. तसेच गावासह शहरातील कचरा यामध्ये टाकल्या जातो. अनेक पात्रात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. याच पाण्यात भाजीपालादेखील धुतला जातो. या घाण पाण्यामुळे दुर्गंधी वाढत असून, या प्रकारामुळे थेट आजारास निमंत्रण आहे.