शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णीमुळे नद्यांचा श्वास गुदमरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:34 IST

कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील नद्या फारशा प्रवाहीत नाहीत. त्यामध्ये गावागावांतील सांडपाणी सोडण्यात येते. पात्रातही मोठ्या प्रमाणावर चिला, जलपर्णी व शेवाळाचा थर साचल्याने प्रवाह दिसेनासा झाला आहे. पात्रात बेशरम वाढल्याने पाणी विषाक्त झाले आहे. त्यामुळे मानवासह जनावरांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबेशरममुळे पाणी विषाक्त : स्वच्छता अभियान अन् जलयुक्त शिवारची कामे केव्हा? नागरिकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील नद्या फारशा प्रवाहीत नाहीत. त्यामध्ये गावागावांतील सांडपाणी सोडण्यात येते. पात्रातही मोठ्या प्रमाणावर चिला, जलपर्णी व शेवाळाचा थर साचल्याने प्रवाह दिसेनासा झाला आहे. पात्रात बेशरम वाढल्याने पाणी विषाक्त झाले आहे. त्यामुळे मानवासह जनावरांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.केंद्र शासनाने स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा केला. मात्र, गावागावांतील लहान-मोठ्या नद्या व नाल्यांची स्वच्छता कधी झालीच नाही. जलयक्त शिवारमध्ये ही कामे करण्याचे जिल्हा प्रसासनाला कधीही सुचलेच नाही. त्यामुळे नदीपात्रांना बकाल स्वरूप आले असून नद्या आता गटारगंगा बनल्याचे दुर्देवी चित्र बहुतेक गावांत पाहायला मिळते.यंदाच्या पावसाळ्यात नद्यांना पूर गेलाच नाही. त्यामुळे पात्रात मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे. बहुतांश गावांत नदी-नाल्यांवर बंधारे बांधल्याने वाहत्या नद्यांचा प्रवाह खोळंबला. यामध्ये गावातील सांडपाण्याने भर घातली. लहान-मोठ्या कारखान्याचे प्रदूषित पाणी नदी-नाल्यांत सोडण्यात येत असल्याने शुद्ध पाण्याचा स्त्रोत असणाऱ्या नद्यांना गटारीचे स्वरुपा आले आहे. नदी-नाल्यांचा प्रवाह खोळंबल्याने पाण्यात घाण वाढली. यामध्ये जलपर्णीची भर पडली व संपूर्ण नदीपात्रच घाणीच्या विळख्यात सापडले आहे. आरोग्यास हाणीकारक असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून नद्यांची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे.शहरात अंबानाल्यासह सातुर्नाचा नाला हा दलदलीने बुजला आहे. या नाल्यात चमकुºयाची झाडे व जलपर्णी असल्यामुळे अनेकदा ही दलदल लक्षातही येत नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत असल्याने लगतच्या वस्त्यांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेद्वारा नाल्यांची सफाई होत नसल्यामुळे नाले आता नागरिकांच्या जीवावर उठले आहेत.सांडपाण्यावर भाजीपालाशहरातील सांडपाणी ज्या नाल्यांमध्ये सोडले जाते, त्याच सांडपाण्यावर शहरालगतच्या शेतांमध्ये भाजीपाला पिकविला जातो व हाच भाजीपाला शहरात विकला जातो. अत्यंत घातक रसायने यात असल्यामुळे मानवी आरोग्यासाठी हा अत्यंत घातक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारा यावर अद्याप कोणतीही कारवार्ई करण्यात आलेली नाही, हे विशेष.दूषित पाण्यामुळे त्वचेचे रोगनदी-नाल्यांचे प्रदूषित पाणी वापरास अत्यंत घातक आहे. या घाण पाण्याचा त्वचेशी संपर्क आल्यास त्वचेवर खाज आदी होत असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात या दूषित व घाण पाण्यात कपडे धुतले जातात. त्यामुळे त्वचेचे विकार होत आहेत. तसेच हे पाणी जनावर पीत असल्याने त्यांनादेखील तोंडखुरी आदी आजार होत आहेत.नदीपात्रात टाकला जातो कचराशहरातील नाले असो की गावातील नद्या यामध्ये सांडपाणी व कारखाण्याचे प्रदुषीत पाणी सोडल्या जाते. तसेच गावासह शहरातील कचरा यामध्ये टाकल्या जातो. अनेक पात्रात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. याच पाण्यात भाजीपालादेखील धुतला जातो. या घाण पाण्यामुळे दुर्गंधी वाढत असून, या प्रकारामुळे थेट आजारास निमंत्रण आहे.