शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
2
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
3
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
4
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
6
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
7
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
8
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
9
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
10
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
11
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
12
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
13
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
14
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
15
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
16
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
18
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
19
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
20
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

बक्षीसपत्राअभावी आठ हजारांवर घरकुलासाठी अडचणीची जागेअभावी वाढली डोकेदुखी

By जितेंद्र दखने | Published: August 07, 2023 6:19 PM

७० टक्केच कामे, ३० टक्के नागरिक प्रतीक्षेत

अमरावती : ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर घरकुल योजना राबवली जाते. मात्र, जिल्ह्यात घरकुलासाठी जागाच मिळत नसल्याने आठ हजारावर लाभार्थ्यांना अद्याप या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. परिणामी बक्षीसपत्र व भाऊबंदकीही जागेसाठी अडचणीची ठरत असल्याने घरकुल बांधणे अवघड होत आहे.

घरकुलाच्या योजनेंतर्गत जिल्ह्यात ९४ हजार ३८२ कुटुंबांना घर देणे अपेक्षित होते. मात्र जागे अभावी ८ हजार १३० घरकुलांची कामे रखडली आहेत. डीआरडीएअंतर्गत पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, पारधी आवास योजना आदी योजना राबवण्यात येतात. त्यानुसार प्रत्येक तालुकास्तरावर बीडीओंकडून या योजनांची अंमलबजावणी केली जाते. पण, अनेक ठिकाणी जागा उपलब्ध नसणे भाऊबंदकीच्या वादातून कामे रखडणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत.

घरकुल योजनेत ग्रामीण भागातील लाभार्थींना घर बांधण्यासाठी दीड लाख रुपये तर शहरी भागातील नागरिकांना अडीच लाख रुपयांची मदत दिले जाते. घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर सरकारी जमीन उपलब्ध असते. ती सुद्धा गायरानची असल्याने ती वापरता येत नाही. सन २०१५ चा कायदा त्यासाठी अडचणीचा ठरत आहे. सध्या १७०० लाभार्थींसाठी पर्यायी जागा आहे. घरकुल योजनांमध्ये आतापर्यंत केवळ ७० टक्के लाभार्थींना योजनेचा लाभ देता आला तर ३० टक्के लाभार्थी लाभ मिळविण्यास पात्र असतानाही केवळ जागे अभावी त्यांचे घरकुलाचे प्रस्ताव पेडिंग आहेत. 

२ हजार प्रस्ताव बक्षिसपत्रामुळे रखडले

रखडलेल्या प्रस्तावांपैकी २ हजार प्रस्ताव असे आहेत की ज्यांचे बक्षीसपत्र तयार करून दिल्यानंतर पूर्णत्वात जाऊ शकतात. बक्षीसपत्रासाठी एकाच कुटुंबातील सदस्य असणे ही अट आहे. अर्थात कुटुंबप्रमुख या नात्याने एखादी व्यक्ती त्याच्या मालकीच्या जमिनीचा काही भाग त्याच कुटुंबातील एखाद्या सदस्याला बक्षीस म्हणून देऊ शकतात. अशा प्रकारे साधारणत: २ हजार कुटुंबांकडे स्वतःच्या मालकीची जागा आहे. त्या जागेपैकी काही जागा त्या कुटुंबातील पात्र लाभार्थ्यास दिल्यास नवे घरकुल उभे राहू शकते. असे झेडपीचे सीईओ अविश्यांत पंडा यांनी सांगितले.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाAmravatiअमरावतीGovernmentसरकार