शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

मेळघाटात वरुणराजाचा दुष्काळ! १२९ गावांची तहान टँकर-विड्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:17 IST

टंचाई कायम : १२७ विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण, २० टँकरवर मदार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत मे महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार निर्माण केला होता. त्यानंतर आता निम्मा जून महिनाही संपत आला आहे. असे असताना वरुणराजा मात्र अद्यापही बरसला नाही. परिणामी, जिल्ह्यातील मेळघाटासह गैर आदिवासी भागातील १० हजारांवर नागरिकांना २० टँकर व १२७ विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करून १२९ गावांची तहान भागविली जात आहे.

पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, अद्याप जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी, ग्रामीण भागात टँकर आणि विहीर अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये जून महिन्यापर्यंतचे नियोजन केले आहे. मात्र, दरवर्षी जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. पाणीटंचाई निवारणाचे काम वरुणराजा करतो. यंदा जिल्ह्यात उन्हाचा तडाखाही चांगला वाढला आहे. अद्यापपर्यंतही जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. पाऊस लवकर पडला तर टँकर, बोअरवेल अन् विहिरी अधिग्रहण पाणीपुरवठ्यातून नागरिकांचीही सुटका होणार आहे. पाऊस पडत असला तरी कुठे पडतो, तर कुठे काहीच नाही. त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती जोरदार पाऊस पडेपर्यंत सुधारणार नाही.

चिखलदऱ्यातील १० गावांत टँकरने पाणीमेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी, खडीमल, मोथा, लवादा, शहापूर, तारुबांदा, गौलखेडा बाजार, मेहरीअम, बहादरपूर, धरमडोह, गवळीढाणा, आलाडोह, खिरपाणी आदी १० गावांत २० टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

४३ बोअरवेल, ८४ विहिरींचे अधिग्रहणपाणीटंचाई निवारणार्थ प्रश्न सोडविण्यासाठी १०९ गावांत विहिरी, ४३ बोअरवेल आणि ८४ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणांहून वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. यामधून पाणीटंचाईची समस्या निवारण केले जात आहे.

"पाणीटंचाई आराखड्यातील नियोजनानुसार ज्या गावात सध्याही पाणीटंचाईची समस्या आहे, अशा दहा गावांत टँकरने तर १०९ गावांत विहीर व बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे."- सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Melghatमेळघाटwater scarcityपाणी टंचाई