शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात वरुणराजाचा दुष्काळ! १२९ गावांची तहान टँकर-विड्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:17 IST

टंचाई कायम : १२७ विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण, २० टँकरवर मदार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत मे महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार निर्माण केला होता. त्यानंतर आता निम्मा जून महिनाही संपत आला आहे. असे असताना वरुणराजा मात्र अद्यापही बरसला नाही. परिणामी, जिल्ह्यातील मेळघाटासह गैर आदिवासी भागातील १० हजारांवर नागरिकांना २० टँकर व १२७ विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करून १२९ गावांची तहान भागविली जात आहे.

पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, अद्याप जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी, ग्रामीण भागात टँकर आणि विहीर अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये जून महिन्यापर्यंतचे नियोजन केले आहे. मात्र, दरवर्षी जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. पाणीटंचाई निवारणाचे काम वरुणराजा करतो. यंदा जिल्ह्यात उन्हाचा तडाखाही चांगला वाढला आहे. अद्यापपर्यंतही जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. पाऊस लवकर पडला तर टँकर, बोअरवेल अन् विहिरी अधिग्रहण पाणीपुरवठ्यातून नागरिकांचीही सुटका होणार आहे. पाऊस पडत असला तरी कुठे पडतो, तर कुठे काहीच नाही. त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती जोरदार पाऊस पडेपर्यंत सुधारणार नाही.

चिखलदऱ्यातील १० गावांत टँकरने पाणीमेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी, खडीमल, मोथा, लवादा, शहापूर, तारुबांदा, गौलखेडा बाजार, मेहरीअम, बहादरपूर, धरमडोह, गवळीढाणा, आलाडोह, खिरपाणी आदी १० गावांत २० टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

४३ बोअरवेल, ८४ विहिरींचे अधिग्रहणपाणीटंचाई निवारणार्थ प्रश्न सोडविण्यासाठी १०९ गावांत विहिरी, ४३ बोअरवेल आणि ८४ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणांहून वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. यामधून पाणीटंचाईची समस्या निवारण केले जात आहे.

"पाणीटंचाई आराखड्यातील नियोजनानुसार ज्या गावात सध्याही पाणीटंचाईची समस्या आहे, अशा दहा गावांत टँकरने तर १०९ गावांत विहीर व बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे."- सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Melghatमेळघाटwater scarcityपाणी टंचाई