शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

तहानलेल्या वाघांची पाण्यासाठी वणवण, वनविभागाकडून उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 04:40 IST

वाढत्या तापमानामुळे चैत्रातच वैशाख वणव्याच्या झळा सोसणाऱ्या विदर्भात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगलातील पाणवठे आटू लागल्याने वाघांसह वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

- गणेश वासनिकअमरावती  - वाढत्या तापमानामुळे चैत्रातच वैशाख वणव्याच्या झळा सोसणाऱ्या विदर्भात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगलातील पाणवठे आटू लागल्याने वाघांसह वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पहिल्यांदाच मार्चमध्ये अशी परिस्थिती उद्भवल्याने वाघांची तहान भागविणे वनविभागासाठी जिकरीचे झाले आहे.राज्यात सहापैकी ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. तेथे आजमितीला १७० ते १७५ वाघ आहेत. यंदा उन्हाळा तीव्र असेल, अशी शक्यता वेधशाळेने व्यक्त केल्यानंतर व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पुरेसे पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे काम सुरू आहे. जंगलात साधारणपणे १० कि.मी. अंतरावर कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत.काही पाणवठ्यांवर सौरऊर्जेवर स्वयंचलित हातपंपाद्वारा पाणीपुरवठा केला जाणार आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मेळघाट, ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पात प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. उन्हाची धग वाढत असताना काही जंगलांमध्ये वणवा लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे हे दोन महिने वन्यजिवांचे संरक्षण करताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.तपासणीसाठी ‘लिटमस’ पेपरकृत्रिम पाणवठ्यात विषप्रयोग करून वन्यजिवांची शिकार करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणवठ्यातील पाणी १२ तासांपेक्षा अधिक काळ साठवून राहता कामा नये. पाणवठ्यात कोणी विषप्रयोग केला असेल, तर ते तपासून पाहण्यासाठी वनकर्मचाºयांना तांबडा लिटमस पेपरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणवठ्यात विष टाकले असेल, तर लिटमस पेपरचा रंग लाल होतो.वन्यजिवांची पाण्यासाठी भटकंती होणार नाही, यादृष्टीने जंगलांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेतव्याघ्र प्रकल्प अधिकाºयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. यासोबतच शिकाºयांवरही आम्ही लक्ष ठेऊन आहे.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर 

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवAmravatiअमरावती