शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

तहानलेल्या वाघांची पाण्यासाठी वणवण, वनविभागाकडून उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 04:40 IST

वाढत्या तापमानामुळे चैत्रातच वैशाख वणव्याच्या झळा सोसणाऱ्या विदर्भात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगलातील पाणवठे आटू लागल्याने वाघांसह वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

- गणेश वासनिकअमरावती  - वाढत्या तापमानामुळे चैत्रातच वैशाख वणव्याच्या झळा सोसणाऱ्या विदर्भात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगलातील पाणवठे आटू लागल्याने वाघांसह वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पहिल्यांदाच मार्चमध्ये अशी परिस्थिती उद्भवल्याने वाघांची तहान भागविणे वनविभागासाठी जिकरीचे झाले आहे.राज्यात सहापैकी ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. तेथे आजमितीला १७० ते १७५ वाघ आहेत. यंदा उन्हाळा तीव्र असेल, अशी शक्यता वेधशाळेने व्यक्त केल्यानंतर व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पुरेसे पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे काम सुरू आहे. जंगलात साधारणपणे १० कि.मी. अंतरावर कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत.काही पाणवठ्यांवर सौरऊर्जेवर स्वयंचलित हातपंपाद्वारा पाणीपुरवठा केला जाणार आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मेळघाट, ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पात प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. उन्हाची धग वाढत असताना काही जंगलांमध्ये वणवा लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे हे दोन महिने वन्यजिवांचे संरक्षण करताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.तपासणीसाठी ‘लिटमस’ पेपरकृत्रिम पाणवठ्यात विषप्रयोग करून वन्यजिवांची शिकार करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणवठ्यातील पाणी १२ तासांपेक्षा अधिक काळ साठवून राहता कामा नये. पाणवठ्यात कोणी विषप्रयोग केला असेल, तर ते तपासून पाहण्यासाठी वनकर्मचाºयांना तांबडा लिटमस पेपरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणवठ्यात विष टाकले असेल, तर लिटमस पेपरचा रंग लाल होतो.वन्यजिवांची पाण्यासाठी भटकंती होणार नाही, यादृष्टीने जंगलांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेतव्याघ्र प्रकल्प अधिकाºयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. यासोबतच शिकाºयांवरही आम्ही लक्ष ठेऊन आहे.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर 

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवAmravatiअमरावती