शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘बाबा, मला आत्ताच घ्यायला या..!’

By admin | Updated: October 5, 2014 22:56 IST

‘बाबा..मला आत्ताच घ्यायला या, माझ्या जीवाला धोका आहे..’ २२ सप्टेंबरला उशिरा रात्री, मृत रूपालीने थूगाव पिंप्री येथे वडिलांना फोन करून स्वत:च्या स्थितीची कळकळीने कल्पना दिली होती. सासरी

रूपालीचा फोन : सासरच्यांविरूध्द गुन्हा अमरावती : ‘बाबा..मला आत्ताच घ्यायला या, माझ्या जीवाला धोका आहे..’ २२ सप्टेंबरला उशिरा रात्री, मृत रूपालीने थूगाव पिंप्री येथे वडिलांना फोन करून स्वत:च्या स्थितीची कळकळीने कल्पना दिली होती. सासरी नांदण्याची रूपालीची अजिबात तयारी नव्हती. परंतु सासरच्या मंडळींनी दिलेल्या आश्वासनानंतर रूपालीची समजूत घालून इतर पालकांप्रमाणे रूपालीचे पालकही परतले. हीच त्यांची चूक ठरली. शेवटी, शारीरिक आणि मानसिक यातनांना कंटाळलेल्या रूपालीचा तिच्या सासरच्यांनी काटा काढलाच!‘लोकमत’च्या ५ आॅक्टोबरच्या अंकात ‘विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील रूपाली तुरखडे हत्येप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल केला. घटनेच्या चार दिवसांनी रूपाली तुरखडे हत्येप्रकरणी ठाणेदारांनी भादंविच्या कलम ४९८(अ),३०६, ३०४ (ब) नुसार गुन्हे नोंदवून या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे. चांदूरबाजार तालुक्यातील थूगाव पिंप्री येथील लंगोटे कुटुंबातील लाडकी लेक रूपालीचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील सतीश तुरखडे याचेशी झाला. लग्नात लंगोटे कुटुंबाने सतीशला दीड लाख रूपये हुंडा दिला होता. परंतु अवघ्या सहा महिन्यांतच रूपालीचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. रूपालीच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, हौसमौज रूपालीच्या वाट्याला आलीच नाही.ठाणेदाराची भूमिका संशयास्पद २ आॅक्टोेबरला घरून बेपत्ता झालेल्या रूपालीचा मृतदेह घरापासून अवघ्या १ हजार मी. अंतरावरील अरूंद विहिरीत सापडल्यानंतर लंगोटे कुटुंबाने अंजनगाव पोलीस ठाण्यात रूपालीच्या सासरच्या मंडळींविरूध्द तक्रार दिली. परंतु येथील ठाणेदार गजानन पडघम यांनी तब्बल ४ दिवसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा तर ठाणेदारांचा प्रयत्न नव्हता? यातून ठाणेदाराला कुठला लाभ तर होणार नव्हता? असा संशय बळावतोे. त्यामुळे याप्रकरणातील ठाणेदाराची भूमिका तपासून पाहायला हवी.