शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

दिवसा काँग्रेसचे, रात्री भाजपचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 1:44 AM

शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झालेली आहे. दिवसा काँग्रेसचे मिरविणारे नेते रात्र होताच भाजपचे होतात. असे किती दिवस चालणार, असा सवाल करीत काँग्रेसचे नेते विश्वासराव देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची भूमिका मंगळवारच्या पत्रपरिषदेत स्पष्ट केली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : विश्वासराव देशमुखांचा प्रहार, उमेदवारीचाही दावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झालेली आहे. दिवसा काँग्रेसचे मिरविणारे नेते रात्र होताच भाजपचे होतात. असे किती दिवस चालणार, असा सवाल करीत काँग्रेसचे नेते विश्वासराव देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची भूमिका मंगळवारच्या पत्रपरिषदेत स्पष्ट केली.काँगे्रसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्या निवडणुकीत प्रचारात असलेले काँगे्रसचे तत्कालीन शहर अध्यक्ष विश्वासराव देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यासोबतच त्यांनी काँगे्रसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यानांही लक्ष्य केले. निष्ठावान कार्यकर्ते पक्षापासून का दुरावत जात आहे, याचा ऊहापोह विश्वासरावांनी करून शहर काँग्रेसला घरचा आहेर दिला.काँग्रसचे पदाधिकारी भाजप नेत्यांना कार्यक्रमात बोलावतात. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडतात. पक्ष याची नोंद घेत नाही. केवळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे अन् पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्यासमवेत फोटो काढणे हे पक्षकार्य समजावे काय, असा सवाल देशमुख यांनी केला. पक्षाच्या शहराध्यक्षांकडे दिवसभर कुणीच कामासाठी जात नाहीत. स्वत: निष्क्रिय राहायचे आणि अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडायचे. मुंबई, दिल्लीशी संबंध राखून पदे टिकवून ठेवायची, हे काँग्रेससाठी घातक असल्याचे मतप्रदर्शन विश्वासराव देशमुख यांनी केले.बबलू देशमूख, पुष्पाताई बोंडे व आता अनिल माधोगडिया यांना कोणी पाडले? पक्षाचे बहुमत असताना पोटे निवडून येतातच कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकांना किती काळ मूर्ख बनविणार? काँग्रेस पक्षाचे राजकारण बिघडले असल्याने आम्ही दबंग नेते बाहेर आलो आहोत. आम्ही पक्षाचे निष्ठावान पाईक आहोत. आमचे रक्त काँग्रेसचे आहे. आमच्यावर कुठलाही डाग नाही. स्वच्छ प्रतिमा आहे. म्हणून आम्ही उमेदवारी मागतो आहोत. पक्षाने तिकीट न दिल्यास विचार करू, असे स्पष्ट करून आगामी काळात घमासान होणार असल्याचे संकेत देशमुख यांनी दिले. पत्रपरिषदेला हरिभाऊ दातेराव, मिर्झा जुबेर, जावेद अली, श्यामबाबू रावलानी, सत्येंद्रसिंग रोटे, सलीम मोबाइल आदी उपस्थित होते.काँग्रेसचे नेते भाजपच्या दावणीलास्वाभिमान महत्त्वाचा आहे. पण, अलीकडे हाच स्वाभिमान हरविला आहे. पक्षाचे नेते भाजपाच्या दावणीला बांधले आहे. काँग्रेसला उमेदवार सापडला नाही म्हणून राणा यांना पाठिंबा द्यावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. मतदारांची दिशाभूल केल्याने नेत्यांना मतदारांच्या संतापाला समोरे जावे लागते. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या विरोधात कणखरपणे समोर येण्याचे आवाहन केले आहे. आमाचा पवित्राही त्यानुसारच आहे, असेही विश्वासराव देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा