शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

८४० ग्रामपंचायतींचा ग्रामसभांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:15 IST

अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना १५ जानेवारी २०२१ च्या परिपत्रकानुसार स्थगिती देण्यात आली होती. मात्र, ही स्थगिती ग्रामविकास विभागाने ...

अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना १५ जानेवारी २०२१ च्या परिपत्रकानुसार स्थगिती देण्यात आली होती. मात्र, ही स्थगिती ग्रामविकास विभागाने ११ फेब्रुवारी रोजीच्या पत्रानुसार स्थगिती उठविली आहे. यामुळे जिल्हाभरातील ८४० ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र दुसरीकडे सध्या जिल्हाभरात कोरोना संक्रमित रूग्णाची वाढती संख्या लक्षात घेता सभा,मेळाव व अन्य कार्यक्रमाना जिल्हाधिकारी यांनी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ग्रामसभा घेण्याचा पेच सध्या तरी निर्माण झाला आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने १५ जानेवारीच्या जारी केलेल्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र ग्रामविकास विभागाने ही स्थगिती उठविली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पत्रानुसार जिल्ह्यात ग्रामसभा घेताना ग्रामपंचायतीने सोशल फिजिकल डिस्टंसिंग,कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे. तसेच पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. ग्रामसभेच्या मंजुरी अभावी वार्षिक आराखडे शासनाच्या विविध योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, थेट सरपंच विरोधातील अविश्वास ठराव चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च या बाबी प्रलंबित राहिल्या आहेत तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देखील कमी होत चालला असल्याने जनजीवन पूर्ववत होत असल्याने शासन ग्रामसभेत स्थगिती उठविली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. एकिकडे स्थगिती उठविली असल्याने सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याची लगीनघाई सुरू झाली असून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामसभेची तारीख काढण्याचे नियोजनाच्या हालचाली सुरू असतांनाच जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी वाढता संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सभा,मेळावे आदींना मनाई आदेश जारी केला आहे.त्यामुळे ग्रामविकास विभागाने ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली असला तरी जिल्ह्यात मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पेच निर्माण झाला आहे.

बॉक्स

सभा, मेळाव्यावर निर्बंध शिथिल झाल्यानंतर निर्णय

१५ जानेवारी रोजी ग्रामविकास विभागाने ग्रामसभांना ३१ मार्च पर्यत स्थगिती देण्याबाबतचे निर्देश दिले होते.अशातच ११ फेब्रुवारी रोजी स्थगीत घटवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सभा घेण्याचे सूचविले आहे.मात्र सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रक्रोप वाढत असल्याने मेळावे, सभाना मनाई केली आहे.याबाबत नियम शिथिल झाल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार जाणार असल्याचे जिल्हा परिषद पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ दिलीप मानकर यांनी सांगितले.