शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

मुख्यमंत्री साहेब, मुंबईत दुष्काळ नाही!

By admin | Updated: March 13, 2016 00:14 IST

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. परंतु मुंबईत दुष्काळ का पडत नाही. इथे जास्त पाऊ स आला तरी मरण आणि नाही आला तरीही मरण.

बच्चू कडू : राज्यस्तरीय कृषी समृध्दी योजना, कृषी प्रदर्शनीचे उद्घाटनपरतवाडा : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. परंतु मुंबईत दुष्काळ का पडत नाही. इथे जास्त पाऊ स आला तरी मरण आणि नाही आला तरीही मरण. शेतकऱ्यांना अगोदर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, मगच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा. वारकऱ्यांनी वारकरी झेंड्यासोबत शेतकऱ्यांचा झेंडा घेऊन मुंबई गाठली तर सरकारची फजिती होईल, असे मत बच्चू कडू यांनी मांडले. अचलपूर बाजार समितीत आयोजित राज्यस्तरीय कृषी समृध्दी महोत्सव, शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी किरण गीत्ते, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार मनोज लोणारकर, बाजार समितीचे संचालक मनोहर जाधव, सतीश व्यास, गजानन मोरे, सुधीर रहाटे, तालुका कृषी अधिकारी ए.बी. जाधव शेतकरी समृध्दी संस्थेचे यशवंत पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, २००६ पासून स्वामिनाथन आयोगाने शेतकऱ्यांच्या ज्या शिफारशी केल्या त्या लागू केल्यास आत्महत्या थांबतील. मात्र सत्ताधाऱ्यांना त्यांचे काही एक घेणे, देणे नाही. सातवा वेतन आयोग लागू करताना कर्मचारी महिन्याला तीन हजार रुपयांचे मटन खाणार त्यावर त्याचे वेतन ठरविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकाव्यात. दुष्काळ शहरात नाही, खेड्यात आहे. तेथे आजही पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधांचा अभाव आहे. दुसरीकडे जलयुक्त शिवारामुळे मोठ्या प्रमाणात चांगली कामे झाल्याची पावती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बच्चू कडूंनी अभिनंदन केले. (प्रतिनिधी)देशातील पहिला प्रयोग अचलपुरातप्रकल्पात सौरपंपाचा उपयोग करुन कोरडवाहू शेतींना पाणी देत ओलिताखाली आणण्याचे कार्य करण्याचा प्रयोग देशात पहिल्यांदा अचलपूर मतदारसंघात राबविण्याची तयारी आ. बच्चू कडू यांनी दर्शविली. एका नाल्यातून दुसऱ्या नाल्यात तेथून शेतीला व शेतकऱ्यांचे पाणी सौर पंपाव्दारे देण्याचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे आ.बच्चू कडू यांनी प्रदर्शनीदरम्यान सांगितले. एक तालुका संपलाराज्यात साडेतीन लक्ष शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. ही आकडेवारी पाहता जवळपास नकाशातून एक तालुका संपला एवढी गंभीर अवस्था शेतकऱ्यांची झाली असल्याचे कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी आ. बच्चू कडू यांनी सांगितले. अगोदर स्वामिनाथन आयोग लागू करा, मगच सातवा वेतन आयोग द्या, असे ते म्हणाले.बियाण्यांचे सॉफ्टवेअर राज्यात पहिला प्रयोग अचलपुरातशेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक बियाण्यांपासून होते. तेव्हा एक तालुक्याला किती कोणत्या वाणांचे किती बियाणे लागते, ते उत्कृष्ट की निकृष्ट याचे नवीन तंत्रज्ञान सॉफ्टवेअर तयार करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण केली आहे. त्यामुळे देशातील पहिला प्रयोग अचलपूर मतदारसंघात करण्यात येणार असल्याचे आ. बच्चू कडू यांनी यावेळी जाहीर केले. जलयुक्त शिवारातून यशस्वी कार्यजिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात यशस्वी कामे करण्यात आली आहे. सोलर पंप अंतर्गत जिल्ह्यात एकूण १७०० पंपाचे उद्दिष्ट असून केवळ ३० टक्के रक्कम भरून हा पंप शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यासाठी ८०० शेतकऱ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी केवळ दीडशे शेतकऱ्यांनीच रक्कम भरल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.