शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

सांगा मुख्यमंत्री, सीआयडी चौकशी केव्हा ?

By admin | Updated: September 6, 2016 00:09 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन मुलांच्या नरबळीचा प्रयत्न झाला.

दीपक केसरकरही गप्पच : प्रथमेश, अजयच्या जीवाचे मोल शून्य !अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन मुलांच्या नरबळीचा प्रयत्न झाला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्यांसंबंधी आश्रमाच्या भूमिकेबाबत नाना प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांच्या उत्तरासाठी जिल्हा धगधगतोय. सामान्यांना प्रकरणाची सीआयडी चौकशी हवी आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र महिना उलटूनही या प्रकरणी आश्चर्यकारक शांत आहेत. नरबळीचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर आश्रमाने अनेक सत्य लपवून ठेवले. अजय वणवेवर झालेला नरबळीचा हल्ला लपवून तो स्वच्छतागृहात पडल्याचे खोटे चित्र उभे केले. प्रथमेश सगणे याचा गळा नरबळीसाठी कापला असताना तो वरच्या माळ्यावरुन पडल्याचा बनाव करण्यात आला. दोन्ही घटनांची आश्रमाने स्वत:हून पोलीस तक्रार दिली नाही. सामाजिक न्याय आणि शिक्षण खात्यांना माहिती दिली नाही. अजय वणवेच्या आईने तक्रार दिल्यावर ती मागे घेण्यासाठी आश्रमातील यंत्रणा वापरली जात आहे. प्रथमेश सगणे याच्या नातेवाईकांवर दबाव कसण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. ‘लोकमत’ने हे प्रकरण शोधून काढल्यामुळे नरबळी प्रकरणाला वाचा फुटली. आम्ही सांगतो, तशी ‘लोकमत’ आणि प्रतिनिधीविरुद्ध वक्तव्ये द्या, असाही दबाव नातेवाईकांवर आणण्यात आला. नरबळी प्रकरणाला महिना उलटून आश्रमाने एकदाही भूमिका मांडली नाही. बातम्या छापल्या न जाण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कापून टाकण्याची भाषा वापरली. लोकांनी सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी आणि शंकर महाराजांच्या अटकेसाठी रान उठविले. चांदूरेल्वे, धामणगाव रेल्वे, अंजनसिंगी कडकडीत बंद पाळला गेला. पिंपळखुटा येथील आश्रमावर अमरावतीतून मोटरसायकल मार्च धडकला. अमरावतीत महामोर्चा निघाला. नागपुरातील संविधान चौकात धरणे दिली गेली. सर्वच आंदोलनांत सर्वपक्षीय लोक सहभागी झालेत. आंदोलने उभारणाऱ्या आणि निवेदने देणाऱ्या ५० पेक्षा अधिक संघटना महिनाभरापासून प्रथमेश आणि अजयच्या न्यायासाठी पोटतिडकीने लढत आहेत. घटनेची पाळेमुळे खोल रुजली आहेत. आश्रमाची आणि तमाम पदाधिकाऱ्यांची सर्वंकष चौकशी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत केव्हाच पोहोचली आहे. शासनाचा हत्ती मात्र जराही हललेला नाही. भाजपाच्या राज्यात दलित हिंदू म्हणून जगणाऱ्या मातंग आणि चर्मकारांची मुले बळी देण्यासाठी वापरली जातात आणि शासन हिंदूत्वाच्या नावावर आश्रमाच्या, महाराजांच्या पाठीशी उभे ठाकते, या भावनेने दुखावलेल्या समाजाने धर्मांतरणाच्या मुद्यावर बैठकही घेतली. तरीही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर कमालीचे शांत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्याचे भाचे आहेत. मामांच्या गावातील न्यायासाठी लढणाऱ्या लोकांचा एकच सवाल आहे - सांगा मुख्यमंत्री, सीआयडी चौकशी केव्हा ?