शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
4
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
5
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
6
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
7
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
8
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
9
ह्रदयद्रावक! नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून आजोबांनी काढली रात्र; चाळीसगावमधील संतापजनक घटना
10
Adhik Maas 2026: अधिक मासात संकटमुक्तीसाठी करा 'ही' दत्तसेवा; मिळेल श्री दत्तगुरूंचा अखंड आशीर्वाद!
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातविरुद्ध दोषारोपपत्र; ४९ दिवसांपासून कोठडीत; १०५ साक्षीदारांकडे चौकशी
12
Sambit Patra : "२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा सवाल
13
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
14
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
15
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
16
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
17
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
19
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
20
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या प्रवेशात बदल्यांनी केला घोळ

By admin | Updated: June 15, 2014 23:17 IST

जिल्ह्यात नर्सरी व पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे. त्यातच शासकीय बदल्यांमुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता शहरातील शाळांमध्ये पायपीट करावी

अमरावती : जिल्ह्यात नर्सरी व पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे. त्यातच शासकीय बदल्यांमुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता शहरातील शाळांमध्ये पायपीट करावी लागत आहे. काही शाळा व्यवस्थापनाच्या आरक्षण कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यात १५० च्यावर नर्सरी शाळा असून त्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी विविध शासकीय शाळा व खासगी शाळांमध्ये प्रवेशाकरिता अर्ज केले आहे. तसेच इयत्ता पाचवीचा प्रवेश ‘ड्रा’ पध्दतीने होत असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मागील वर्षात जिल्ह्यामध्ये २७५४ मान्यताप्राप्त शाळांमधून इयत्ता १ ते ५ च्या सुमारे २ लाख ३५ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा प्रवेश प्रक्रिया सुरु असून या संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये शासकीय, खासगी शाळा व मंडळाचा सहभाग आहे. तसेच ६ ते ९ वीपर्यंत १ लाख ५२ हजार ८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २६ जून रोजी शाळा सुरु होणार असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली आहे. नर्सरी स्कुलमधील बहुतांश प्रवेश प्रक्रिया संपत आल्या असून फक्त ५ वीच्या प्रवेशाची पालक आता प्रतीक्षा करीत आहेत. यंदा ‘ड्रा’ पद्धतीने पाचवीचे विद्यार्थी प्रवेशास पात्र राहणार आहेत. त्यामुळे अनेक पालकांनी विविध शाळांमध्ये पाल्ल्याचे अर्ज दाखल केले आहे. येत्या १७ तारखेला ५ वीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला ‘ड्रा’ शाळा व्यवस्थापनाकडून उघडण्यात येणार आहे. ‘ड्रा’ पद्धतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने दिलेल्या कोट्यानुसार शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये फक्त बदली होऊन आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बदलीहून आलेल्या पालकांच्या पाल्ल्याचा प्रवेश प्रक्रियेत कोणताही विचार केला गेला नाही. त्यामुळे पालकांची प्रवेशकरिता तारांबळ उडत आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा याकरिता शाळा व्यवस्थापनाच्या कोट्यातून प्रवेश देण्याचे शाळा व्यवस्थापनाने ठरविले आहे. त्यामुळे बदल्याहून आलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे.