शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कालवे बुजले गाळाने, अस्तरीकरणही उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:30 IST

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटले आहे. कालव्यासह लघुकालव्यांत गाळ साचला अन् झाडे-झुडपे वाढली आहेत. यामुळे कुठे पाणी ओसंडून वाहते, तर कुठे प्रवाहच खोळबंतो. त्यामुळे सिंचन दुरापास्त झाले आहे.

ठळक मुद्देसिंचन दुरापास्त : देखभाल दुरूस्तीचा निधी गेला कुठे? शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटले आहे. कालव्यासह लघुकालव्यांत गाळ साचला अन् झाडे-झुडपे वाढली आहेत. यामुळे कुठे पाणी ओसंडून वाहते, तर कुठे प्रवाहच खोळबंतो. त्यामुळे सिंचन दुरापास्त झाले आहे. सिंचनामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् होईल, याचा भ्रमनिराश झालेला. यासाठी दरवर्षी असणारा देखभाल दुरूस्तीचा निधी पाण्यासारखा मुरला काय, असा शेतकºयांचा संतप्त सवाल आहे.उर्ध्व वर्धा प्रकल्पातून मोर्शी, तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव या तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. गेल्या दोन दशकापासून रबी सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने आर्थिक स्तर उंचावेल, ही आशा सपशेल फोल ठरली आहे. सिंचनासाठी उपलब्ध होत असताना अनंत अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागतो. मायनरमधून पुरेसे पाणी येत नाही. मधेच पाणी ओसंडून वाहिल्याने शेतापर्यंत पोहोचत नाही. पाणी मिंळण्यासाठी शेतकºयांनी तक्रार दिली. मात्र, त्याची दखलही घेतली गेली नाही. पाटचरीचेदेखील हेच हाल आहे. समतोल पातळीवर पाटचरीच नसल्याने कुठे पाणी मिळते तर कुठे पोहोचतच नाही, अर्ध्याअधिक पाटचरी गाळाने बुजल्या आहेत. सिंचन विभागाकडून पाणी कराची आकारणी केली जात असताना दुरूस्तीकडे कधी लक्षच दिले जात नाही. त्यामुळे ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.यंदा प्रकल्पातच पाणी नसल्याने पाण्याच्या फक्त दोनच पाळ्या देण्यात येणार आहे. त्यापैकी एक पाळी संपली आता तीन आठवड्यांनी दुसरी पाळी देण्यात येणार आहे.पहिल्या पाळीतच सिंचन विभागाची पोलखोल झाली. मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाच्या भेगांमधून पाणी पाझरते आहे. सरळ विमोचकाची गेट खराब झाल्याने पाण्याचे लिकेज, विमोचकांमधून पाणी ओव्हरटॅप होणे, मायनरमध्ये गाळ असल्याने पाणी ओसंडणे आदी कारणामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी नाना संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे दुसऱ्या पाळीपूर्वी या समस्या जर सोडविल्या न गेल्यास यंदाचा हंगामच वाया जाणार, अशी अवस्था या विभागाच्या बेपर्वा धोरणामुळे शेतकऱ्यांची झाली आहे.मुख्य कालवा धोक्यातमुख्य कालव्याच्या किमी ३९ मध्ये तिवस्याजवळ अस्तरीकरणच उखडले आहे. त्यामुळे मुख्य कालव्यात पाणी मुरत असल्याने कालवाच धोक्यात आला आहे. त्यामुळे पाझरून लगतची शेतीपिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुळात चार इंचाचे अस्तरीकरण दोन ते तीन इंचातच टाकल्यामुळे अस्तरीकरण उखडत आहे. कालव्यात कचरा गाळ व झाडे पडली आहेत. त्यामुळे पाणी प्रवाहित होण्यास अडसर निर्माण होत आहे.मायनर बुजलेत गाळानं अन् झाडानंमायनर कधी देखभाल दुरूस्तीच केली जात नसल्याने अनेक ठिकाणचे लघु कालवे हे गाळाने बुजले आहेत. या लघु कालव्यात झाडे, झुडपे वाढल्याने पाणी प्रवाहित होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मायनर ओव्हरटॅप होतो व पाणी मन मानेल तसे वाहते. यामध्ये लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. तिवसा व शेंदूरजना बाजार भागासह दुष्काळी जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी हा एक प्रकारचा गुन्हा ठरत नाही काय, असा सवाल शेतकºयांचा आहे.