शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

भाजप हाऊसफुल्ल; मेगाभरती बंद - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 5:33 AM

महाजनादेश यात्रा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीतून सुरुवात

सूरज दाहाट/अमित कांडलकर 

तिवसा/गुरुकुंज मोझरी (अमरावती) : महाराष्ट्राच्या विकासासाठी जे-जे कोणी उपयोगी ठरतील, त्यांच्यातील गुणवत्ता ओळखून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-पदाधिकारी व अन्य काही जणांना भाजपमध्ये प्रवेश दिला. मात्र, आता भाजप हाऊसफुल्ल झाल्याने मेगाभरती बंद करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निघालेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ राष्ट्रसंतांच्या गुरुकुंजातून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते.

विरोधकांकडून शहराशहरात ‘भाजपमध्ये प्रवेश देणे सुरू आहे’ अशी फलके लावण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर ज्यांच्यात क्षमता आहे, त्यांनाच प्रवेश दिल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता दिली. महाजनादेश यात्रेतून आम्ही महाराष्ट्रातल्या गावांमध्ये जाऊन जनजागृती करतोय. महाराष्ट्रात सगळ्या समस्या संपल्या, असा दावा आम्ही करत नाही. मात्र, आधीच्या सरकारपेक्षा आम्ही दुप्पट काम केले. दीड लाख शेतकऱ्यांना कृषिपंपाचे कनेक्शन, गोसे खुर्दमध्ये एक लाख हेक्टरचा सिंचनाचा पुढील टप्पा, पाच वर्षांत ५० हजार कोटींची कर्जमाफी, ३० हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते, १८ हजार गावांमध्ये पिण्याचे पाणी, ५० हजार शौचालय, २० हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, ४० लाख कुटुंबांची बचत गटांशी जोडणी, ही आपल्या सरकारची प्रमुख कामे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकरी आत्महत्या रोखण्याचे उद्दिष्ट : राजनाथ सिंहशेतकऱ्यांच्या खात्यात आजवर १८ हजार ३६ कोटी रुपये जमाझालेत. आता उद्दिष्ट आहे ते महाराष्टÑातील शेतकरी आत्महत्या रोखण्याचे. ती उद्दिष्टपूर्ती करू, अशी ग्वाही देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.नागरिकांकडून घोषणाबाजीमहाजनादेश यात्रेचा रथ मोझरीतून जात असताना काही शेतकºयांनी कर्जमाफी करण्याची घोषणाबाजी के ली. राज्यात शेतकºयांची परिस्थिती वाईट असताना तुम्हाला शेतकºयांप्रती जाण नाही. महाजनादेश यात्रेतून तुम्ही काय साध्य करणार आहात, अशी विचारणा काही शेतकºयांनी मुख्यमंत्र्यांना केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस