राजकारण गरम! बावनकुळे बच्चू कडूंच्या भेटीस, उपोषण मागे घ्या... देश शोकात! बावनकुळेंची भावनिक साद

By शुभांगी काळमेघ | Updated: June 13, 2025 20:04 IST2025-06-13T20:02:57+5:302025-06-13T20:04:30+5:30

अमरावतीतील उपोषण आंदोलनावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट : दिव्यांगांना ६,००० रुपये मानधन आणि शेतकरी कर्जमाफीसाठी आश्वासन

Bawankule meets Bachchu Kadu, call off the hunger strike... The country is in mourning! Bawankule's emotional appeal | राजकारण गरम! बावनकुळे बच्चू कडूंच्या भेटीस, उपोषण मागे घ्या... देश शोकात! बावनकुळेंची भावनिक साद

Bawankule meets Bachchu Kadu, call off the hunger strike... The country is in mourning! Bawankule's emotional appeal

अमरावती :अमरावतीतील प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर, आज राज्याचे महसूलमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत झालेल्या  बैठकीतील मुख्य मुद्दे

  • दिव्यांगांना ६,००० रुपये मानधन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेत दिव्यांगांना इतर राज्यांप्रमाणे ६,००० रुपये मानधन देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात लवकरच पुरवणी काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
  • शेतकरी कर्जमाफी: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोन दिवसांत समिती स्थापन करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. त्यांनी सांगितले की, "शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाल्यास आम्हीच सरकारचे कर्ज फेडू," असे ते म्हणाले.
  • इतर मागण्या: उर्वरित १७ मागण्यांसाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी लवकरच बैठक होईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.


बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. तथापि, चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशातील मोठ्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राच्या शोकस्मरणार्थ उपोषण मागे घेण्याची विनंती केली. कडूंच्या सांगण्याप्रमाणे, "सर्व राष्ट्र दुःखात आहे, त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे," अशी बावनकुळे यांनी त्यांना विनंती केली.


बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील, खासदार राजू शेट्टी आणि इतर शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. राजू शेट्टी यांनी १५ जून रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. जर सरकारने मागण्या मान्य न केल्यास, हे आंदोलन राज्यभरात तीव्र होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, परंतु कडू यांनी अद्याप उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. 


 

Web Title: Bawankule meets Bachchu Kadu, call off the hunger strike... The country is in mourning! Bawankule's emotional appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.