शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

बच्चू कडू म्हणाले, तोपर्यंत पाणी डोक्यावरून गेलं होतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 10:37 AM

आपण आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

गजानन चोपडे

अमरावती : आपण आधीही एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत सहभागी झालो होतो आणि आताही त्यांच्यासोबतच आहे. माझा कुणालाही वैयक्तिक विरोध नाही; पण या सरकारमध्ये कुठेही ताळमेळ नसल्याचा पदोपदी अनुभव आला. आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन करून शिंदेंसोबत असल्याची माहिती दिली. त्यांनी नाराजीही व्यक्त केली, मात्र तोपर्यंत पाणी डोक्यावरून निघून गेले होते. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे सांगत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुवाहाटीहून लोकमतशी संवाद साधला.

मंगळवारी बच्चू कडू पुण्याहून मुंबईला पोहोचले तेव्हापर्यंत ते ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत होते. परंतु अचानक रात्री त्यांनी सुरत गाठले. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेलही त्यांच्यासोबत शिंदे यांच्या कॅम्पमध्ये सामील झाले. आपण आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री शिवसेनेच्याच आमदारांना वेळ देत नसल्याचा पाढाही कडू यांनी वाचला. पक्षातील आमदारांचीच कामे होत नसतील तर इतरांची काय अवस्था असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मंत्र्यांचीच कामे होत नव्हती, विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता. त्यामुळे हा असंतोष वाढत गेला आणि त्याचे पर्यवसान आमदारांच्या बंडखोरीत झाले. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह ४० आमदार आहेत. ही संख्या लवकरच ५०च्या घरात जाणार असल्याचा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे. वेगळा गट स्थापन करण्याची प्रक्रियादेखील सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

बंडाळीनंतर यवतमाळातील शिवसैनिक संभ्रमात

सेनेत उभी फूट पडल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भूमरे हे बंडखोरांच्या गटात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे स्थानिक नेते आमदार संजय राठोड यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक संभ्रमात असल्याचे चित्र आहे. मंगळवारी संजय राठोड हे बंडखोरांच्या गटात सहभागी झाल्याच्या बातम्या वाहिन्यांवरून प्रसारित होत होत्या. मात्र राठोड यांनी सायंकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीला उपस्थिती लावली. बुधवारी सकाळी संजय राठोड गुवाहाटीकडे रवाना झाल्याच्या वार्ता आल्या. मात्र दुपारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या समर्थक आमदारांच्या यादीत संजय राठोड यांचे नाव नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे