शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

राज्यात ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:42 IST

राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी जाहीर केला.

ठळक मुद्दे२६ फेब्रुवारीला मतदानरिक्त ६,८५१ सदस्यपदे आचारसंहिता लागू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी उशिरा जाहीर केला. ५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू होऊन २५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीपासून संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने १० जानेवारीला जाहीर केला होता. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध झाली. त्याचे एक दिवसपूर्व आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणुुकीची नोटीस २५ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागविणे व सादर करणे, १२ फेब्रुवारीला अर्जांची छाननी, १५ फेब्रुवारीला उमेदवारी मागे घेणे, १५ फेब्रुवारीला चिन्ह वाटप, यादी प्रसिद्ध करणे, २५ फेब्रुवारीला मतदान व २६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.यावेळी आरक्षित जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. यापूर्वी सहा महिन्यांची मुदत दिली जायची. यावेळी मात्र, ही सुविधा नाकारल्यामुळे पुन्हा अनेक पदे रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज व शपथपत्र पारंपरिक पद्धतीनेच सादर करण्याची मुभा आयोगाने दिली आहे. यावेळी कोकण विभागात ४२, नाशिक विभागात ७५, पुणे विभागात १३२, औरंगाबाद विभागात ३५, अमरावती विभागात ११, तर नागपूर विभागात २२ अशा एकूण ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये सरपंचपदाची थेट जनतेमधून निवडणूक होणार आहे.जिल्हानिहाय पोटनिवडणुका असणाऱ्या ग्रामपंचायतीराज्यात ४,१०२ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त सदस्यपदांसाठी निवडणुुका होत आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात ७८, पालघर ६५, रायगड १६५, रत्नागिरी २६३, सिंधुदुर्ग ८०, नाशिक २७८, धुुळे ८४, जळगाव १३२, नंदूरबार ४१, अहमदनगर १२८, पुणे २७४, सोलापूर ११७, सातारा ४२७, सांगली ४२, कोल्हापूर १०९, औरंगाबाद ७३, बीड ४६, नांदेड १८९, परभणी ७३, उस्मानाबाद ७३, जालना ७८, लातूर ११०, हिंगोली ७९, अमरावती १३०, अकोला ९४, यवतमाळ २०६, वाशिम ५६, बुलडाणा १०६, नागपूर ६४, वर्धा ५६, चंद्रपूर ११४, भंडारा ३२, गोंदिया ६५ व गडचिरोली जिल्ह्यातील २०७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक