शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

राज्यात ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:42 IST

राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी जाहीर केला.

ठळक मुद्दे२६ फेब्रुवारीला मतदानरिक्त ६,८५१ सदस्यपदे आचारसंहिता लागू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी उशिरा जाहीर केला. ५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू होऊन २५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीपासून संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने १० जानेवारीला जाहीर केला होता. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध झाली. त्याचे एक दिवसपूर्व आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणुुकीची नोटीस २५ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागविणे व सादर करणे, १२ फेब्रुवारीला अर्जांची छाननी, १५ फेब्रुवारीला उमेदवारी मागे घेणे, १५ फेब्रुवारीला चिन्ह वाटप, यादी प्रसिद्ध करणे, २५ फेब्रुवारीला मतदान व २६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.यावेळी आरक्षित जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. यापूर्वी सहा महिन्यांची मुदत दिली जायची. यावेळी मात्र, ही सुविधा नाकारल्यामुळे पुन्हा अनेक पदे रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज व शपथपत्र पारंपरिक पद्धतीनेच सादर करण्याची मुभा आयोगाने दिली आहे. यावेळी कोकण विभागात ४२, नाशिक विभागात ७५, पुणे विभागात १३२, औरंगाबाद विभागात ३५, अमरावती विभागात ११, तर नागपूर विभागात २२ अशा एकूण ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये सरपंचपदाची थेट जनतेमधून निवडणूक होणार आहे.जिल्हानिहाय पोटनिवडणुका असणाऱ्या ग्रामपंचायतीराज्यात ४,१०२ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त सदस्यपदांसाठी निवडणुुका होत आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात ७८, पालघर ६५, रायगड १६५, रत्नागिरी २६३, सिंधुदुर्ग ८०, नाशिक २७८, धुुळे ८४, जळगाव १३२, नंदूरबार ४१, अहमदनगर १२८, पुणे २७४, सोलापूर ११७, सातारा ४२७, सांगली ४२, कोल्हापूर १०९, औरंगाबाद ७३, बीड ४६, नांदेड १८९, परभणी ७३, उस्मानाबाद ७३, जालना ७८, लातूर ११०, हिंगोली ७९, अमरावती १३०, अकोला ९४, यवतमाळ २०६, वाशिम ५६, बुलडाणा १०६, नागपूर ६४, वर्धा ५६, चंद्रपूर ११४, भंडारा ३२, गोंदिया ६५ व गडचिरोली जिल्ह्यातील २०७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक