शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

राज्यात ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:42 IST

राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी जाहीर केला.

ठळक मुद्दे२६ फेब्रुवारीला मतदानरिक्त ६,८५१ सदस्यपदे आचारसंहिता लागू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी उशिरा जाहीर केला. ५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू होऊन २५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीपासून संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने १० जानेवारीला जाहीर केला होता. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध झाली. त्याचे एक दिवसपूर्व आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणुुकीची नोटीस २५ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागविणे व सादर करणे, १२ फेब्रुवारीला अर्जांची छाननी, १५ फेब्रुवारीला उमेदवारी मागे घेणे, १५ फेब्रुवारीला चिन्ह वाटप, यादी प्रसिद्ध करणे, २५ फेब्रुवारीला मतदान व २६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.यावेळी आरक्षित जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. यापूर्वी सहा महिन्यांची मुदत दिली जायची. यावेळी मात्र, ही सुविधा नाकारल्यामुळे पुन्हा अनेक पदे रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज व शपथपत्र पारंपरिक पद्धतीनेच सादर करण्याची मुभा आयोगाने दिली आहे. यावेळी कोकण विभागात ४२, नाशिक विभागात ७५, पुणे विभागात १३२, औरंगाबाद विभागात ३५, अमरावती विभागात ११, तर नागपूर विभागात २२ अशा एकूण ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये सरपंचपदाची थेट जनतेमधून निवडणूक होणार आहे.जिल्हानिहाय पोटनिवडणुका असणाऱ्या ग्रामपंचायतीराज्यात ४,१०२ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त सदस्यपदांसाठी निवडणुुका होत आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात ७८, पालघर ६५, रायगड १६५, रत्नागिरी २६३, सिंधुदुर्ग ८०, नाशिक २७८, धुुळे ८४, जळगाव १३२, नंदूरबार ४१, अहमदनगर १२८, पुणे २७४, सोलापूर ११७, सातारा ४२७, सांगली ४२, कोल्हापूर १०९, औरंगाबाद ७३, बीड ४६, नांदेड १८९, परभणी ७३, उस्मानाबाद ७३, जालना ७८, लातूर ११०, हिंगोली ७९, अमरावती १३०, अकोला ९४, यवतमाळ २०६, वाशिम ५६, बुलडाणा १०६, नागपूर ६४, वर्धा ५६, चंद्रपूर ११४, भंडारा ३२, गोंदिया ६५ व गडचिरोली जिल्ह्यातील २०७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक