शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबांच्या पुतळ्यासमोरच पशुंची कत्तल

By admin | Updated: January 22, 2015 00:20 IST

ज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून ...

सुरेश सवळे  चांदूरबाजारज्या संत गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्य समाजातील वैचारिक मानसिक व सामाजिक घाण साफ करण्यात खर्ची घातले त्याच गाडगेबाबांचा पुतळा ४० वर्षांपासून कारंजा ग्रामपंचायत हद्दीतील बहिरम येथे धार्मिकस्थळी घाणीच्या साम्राज्यात आपल्या अस्तित्वावर अश्रू ढाळीत आहे. याच पुतळ्यासमोर ढाबा उभारण्यास परवानगी देण्यात असून तेथे रोज बकऱ्यांची कत्तल केली जाते. इतकेच नव्हे तर शेजारी असलेल्या ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या विहिरीतील दूषित पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जातो. मात्र या गंभीर बाबींकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही, ही शोकांतिका आहे. अख्या विदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील ऐन हिवाळ्याच्या मोसमात भरणारी बहिरम यात्रा हंडी, ब्रॅन्डी व तमाशासाठी ओळखली जात होती. येथे दररोज शेकडो बोकडांची कत्तल केली जाते. तमाशा या यात्रेचा केंद्रबिंदू होता. तमाशगीर महिलांव्दारे त्याकाळी २६ जानेवारीला होणारे झेंडावंदन वर्तमानपत्रावर पहिल्या पानावर झळाकायचे. गाडगेबाबांनी येथे समाजप्रबोधनाचे कीर्तन करुन येथील प्राण्यांच्या बळीला पायबंद घातला. त्यांचा आदर्श जागृत करण्यासाठी सन १९७१ मध्ये अमरावतीच्या तत्कालीन अनंत कॅम्पचे संचालक अजाबराव ठाकरे यांनी बहिरम यात्रेतील भगवान बाबा संस्थानच्या समोरील जागेत गाडगेबाबांचा पुतळा बसविला. याच परिसरातील १९७२ मध्ये पुंडलीकराव घोम यांनी दत्ताचे मंदिर बांधले. मूर्तीचे हात तुटल्यामुळे २००९ मध्ये परतवाड्याचे नगराध्यक्ष सचिन देशमुख यांनी दत्ताची नवीन मूर्ती बसविली. शिरजगाव कसबा येथील रामचंद्र वांगे यांनी त्यावेळी स्वत:च्या मालकीचे पाच एकर शेत विकून आलेल्या पैशातून दत्त मंदिरासमोर भाविकांना बसण्याकरिता टिनशेड व सभागृह बांधले. आज त्या टिनशेडचा केवळ सापळा तेवढा शिल्लक आहे.एवढी वर्षे आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या धार्मिकस्थळी शाकाहारी व मांसाहारी ढाब्याची परवानगी देण्यात आली. या ढाब्यासाठी नाहरकरत प्रमाणपत्र देताना सदर जागा यात्रेकरू व बाजारासाठी राखीव असल्याने ढाब्यासाठी परवानगी देता येत नाही, असा शेरा तत्कालीन कारंजा (बहिरम) ग्रामपंचायतीच्या सचिवाने दिल्यानंतरही तत्कालीन सरपंचाने ढाबा उभारण्यासाठी स्वत:च्या स्वाक्षरीनिशी परवानगी दिल्याची माहिती बहिरम संस्थानचे सुरेंद्र पाटील यांनी दिली. या नाहरकत प्रमाणपत्राची मुदत ३० नोव्हेंबर २०११ रोजीपर्यंत होती. त्यामुळे मुदत संपल्याची नाटीस ग्रामपंचायतीव्दारे संबंधित मालकांना देण्यात आली. तरीसुध्दा ढाबा मालकाने ढाबा न हटविता पक्के बांधकाम केले. त्यामुळे ग्रामपंचाय व पंचायत समिती प्रशासनाने याविरुध्द न्यायालयात धाव घेतली. त्यावर ढाबा मालकाने स्थगनादेश मिळवून ढाबा अद्ययावत सुरू ठेवल्याची माहिती आहे. हा ढाबा अतिक्रमित जागेत उभारल्याची चर्चा आहे. ढाब्याच्या बाजूला केशवराव अढाऊ यांनी सन १९७१ मध्ये बांधलेल्या विहिरीत अंड्याची टरफल्ं टाकली जातात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.